शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची नजर आता औषध दुकानांवर; वर्ध्यात दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 15:16 IST

Wardha news जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकडक संचारबंदीत चोरटे सुसाट

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वंजारी चौक स्थित बॅचलर रोडवर अतुल दादाराव भरणे यांचे औषध दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. तसेच गल्ल्यातील पाच हजार रुपये दिसून आले नाहीत. इतकेच नव्हेतर, दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून त्यातील ८ हजार किमतीची हार्डडीस्क चोरून नेली.

दुसरी चाेरीची घटना मालगुजारीपुरा परिसरात घडली. मालगुजारीपुरा परिसरात आशिष घनश्याम मनोजा (रा. दयालनगर) यांचे औषधी दुकान आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील सहा हजार रुपये चोरून नेले.

तिसरी चोरीची घटना सिंदी लाइन मोहता मार्केट परिसरात घडली. श्यामसुंदर किसनलाल चांडक आणि भागीरथ चांडक यांच्या मालकीच्या कृषी केंद्रात चोरट्याने चोरी केली. श्यामसुंदर यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील १४०० रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रं तसेच भागीरथ चांडक यांच्या दुकानात चोरी करीत गल्ल्यातून २५०० रुपये चोरून नेले. या तिन्ही घटनांची तक्रार शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद असतानाही चोरटे मात्र सुसाट झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाणे तरीही...

शहरातील मोहता मार्केट परिसर आणि वंजारी चौकाच्या अवघ्या काही अंतरावर पोलीस ठाणे आहेत. मात्र, चोरट्यांनी याच परिसरात चोरी करून पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांना जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सीसीटीव्हीचे डोळेही मिटलेलेच

शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारा शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांच्या कार्यकाळात कंट्राेल रूममधील युनिटला आग लागल्याने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे तत्काळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे डोळे सुरू करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

पोलिसांची गस्त वाढवावी

शहरात संचारबंदी असतानाही होणाऱ्या चोऱ्या ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी दिवसापेक्षा रात्रीची गस्त वाढवावी, जेणेकरून चोरट्यांना अटकाव होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Robberyचोरी