शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:08 IST

रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देदेवळीतील चोºयांचा उलगडा नाही : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्या. यापूर्वीही देवळीत चोºया झाल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले असल्याचे दिसत असून त्यांना अटक करण्याचे आव्हाण पोलिसांना आले आहे.पोलीस सुत्रानुसार, धुनिवाले मठ परिसरात डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व रत्नाकर धानकुटे यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे कुलूप तोडल्याचे समोर आले. यात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पपीन रामटेके व नगराळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. तर याच वेळी स्थानिक बजाज चौकातून योगेश बाबूलाल पाली यांच्या मालकीची एम.एच. ३२/एन. ४४७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. तिन्ही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे दिसून आले आहे. गत काही दिवसापांसून जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. देवळीत उच्छाद घालणाºया चोरट्यांकडून आता वर्धेत चोºया केल्याचा आरोप होत आहे. या चोरट्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.पंचनामा करूनही सुगावा मिळत नाहीदेवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच दिवशी पाच घरे फोडण्यात आली. यात सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र चोरट्यांचा कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. या पाच चोºयांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच भागात सतत तीन दिवस चोºया झाल्या. त्याचा छडा लावण्याकरिता पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला होता. आता या चोºयांचा शोध लावण्यात आणखी किती दिवस लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.पोलिसांचा अभ्यास कमी, की चोरटे हुशारचोºयांची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात येते. देवळी आणि वर्धेत तसेच झाले. मात्र पंचनामा करणाºया पोलिसांच्या हाती काहीच आले नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हातीही काहीच आले नाही. यामुळे पोलिसांचा चोºयांच्या तपासात अभ्यास कमी पडतो की चोरटे अधिक हुशार झाले, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जिल्हा पोलिसांनी ज्या चोºया पकडल्या त्यात मोबाईल लंपास झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता पोलीस केवळ मोबाईलच्या आधारावरच चोर पकडण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांनकडून होत असल्याचे दिसत आहे.पोलिसांचे लक्ष दारू अन् जुगारावरचजिल्ह्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केवळ दारू आणि जुगाराच्या गुन्ह्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सध्या दारू आणि जुगाºयांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले आहे.