शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:08 IST

रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देदेवळीतील चोºयांचा उलगडा नाही : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्या. यापूर्वीही देवळीत चोºया झाल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले असल्याचे दिसत असून त्यांना अटक करण्याचे आव्हाण पोलिसांना आले आहे.पोलीस सुत्रानुसार, धुनिवाले मठ परिसरात डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व रत्नाकर धानकुटे यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे कुलूप तोडल्याचे समोर आले. यात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पपीन रामटेके व नगराळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. तर याच वेळी स्थानिक बजाज चौकातून योगेश बाबूलाल पाली यांच्या मालकीची एम.एच. ३२/एन. ४४७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. तिन्ही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे दिसून आले आहे. गत काही दिवसापांसून जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. देवळीत उच्छाद घालणाºया चोरट्यांकडून आता वर्धेत चोºया केल्याचा आरोप होत आहे. या चोरट्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.पंचनामा करूनही सुगावा मिळत नाहीदेवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच दिवशी पाच घरे फोडण्यात आली. यात सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र चोरट्यांचा कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. या पाच चोºयांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच भागात सतत तीन दिवस चोºया झाल्या. त्याचा छडा लावण्याकरिता पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला होता. आता या चोºयांचा शोध लावण्यात आणखी किती दिवस लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.पोलिसांचा अभ्यास कमी, की चोरटे हुशारचोºयांची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात येते. देवळी आणि वर्धेत तसेच झाले. मात्र पंचनामा करणाºया पोलिसांच्या हाती काहीच आले नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हातीही काहीच आले नाही. यामुळे पोलिसांचा चोºयांच्या तपासात अभ्यास कमी पडतो की चोरटे अधिक हुशार झाले, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जिल्हा पोलिसांनी ज्या चोºया पकडल्या त्यात मोबाईल लंपास झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता पोलीस केवळ मोबाईलच्या आधारावरच चोर पकडण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांनकडून होत असल्याचे दिसत आहे.पोलिसांचे लक्ष दारू अन् जुगारावरचजिल्ह्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केवळ दारू आणि जुगाराच्या गुन्ह्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सध्या दारू आणि जुगाºयांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले आहे.