शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे सक्रीय; वर्धेत दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:08 IST

रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देदेवळीतील चोºयांचा उलगडा नाही : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शुक्रवारी देवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्या. यापूर्वीही देवळीत चोºया झाल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाले असल्याचे दिसत असून त्यांना अटक करण्याचे आव्हाण पोलिसांना आले आहे.पोलीस सुत्रानुसार, धुनिवाले मठ परिसरात डॉ. सम्राट नंदकिशोर तोटे व रत्नाकर धानकुटे यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांचे कुलूप तोडल्याचे समोर आले. यात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच त्याची माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पपीन रामटेके व नगराळे यांनी चमुसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. तर याच वेळी स्थानिक बजाज चौकातून योगेश बाबूलाल पाली यांच्या मालकीची एम.एच. ३२/एन. ४४७८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. तिन्ही घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. या संदर्भात पोलिसांचे हात रिकामेच असल्याचे दिसून आले आहे. गत काही दिवसापांसून जिल्ह्यात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून आले आहे. देवळीत उच्छाद घालणाºया चोरट्यांकडून आता वर्धेत चोºया केल्याचा आरोप होत आहे. या चोरट्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.पंचनामा करूनही सुगावा मिळत नाहीदेवळी तालुक्यातील शिरपूर (होरे) येथे एकाच दिवशी पाच घरे फोडण्यात आली. यात सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र चोरट्यांचा कुठलाही सुगावा त्यांच्या हाती लागला नाही. या पाच चोºयांपूर्वी याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच भागात सतत तीन दिवस चोºया झाल्या. त्याचा छडा लावण्याकरिता पोलिसांना महिन्याचा कालावधी लागला होता. आता या चोºयांचा शोध लावण्यात आणखी किती दिवस लागेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.पोलिसांचा अभ्यास कमी, की चोरटे हुशारचोºयांची माहिती मिळताच पोलिसांकडून घटनास्थळ गाठण्यात येते. देवळी आणि वर्धेत तसेच झाले. मात्र पंचनामा करणाºया पोलिसांच्या हाती काहीच आले नसल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या शोधाकरिता श्वान पथकाला व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या हातीही काहीच आले नाही. यामुळे पोलिसांचा चोºयांच्या तपासात अभ्यास कमी पडतो की चोरटे अधिक हुशार झाले, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.जिल्हा पोलिसांनी ज्या चोºया पकडल्या त्यात मोबाईल लंपास झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आता पोलीस केवळ मोबाईलच्या आधारावरच चोर पकडण्यात यशस्वी होत असल्याचा आरोप सर्वसामान्यांनकडून होत असल्याचे दिसत आहे.पोलिसांचे लक्ष दारू अन् जुगारावरचजिल्ह्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून केवळ दारू आणि जुगाराच्या गुन्ह्यावरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून सध्या दारू आणि जुगाºयांवरच कारवाई होत असल्याचे दिसून आले आहे.