शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

आजनसरा बॅरेजची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: December 29, 2014 02:01 IST

वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़

वर्धा : वर्षानुवर्षे खितपत पडल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ही परंपराच जणू वर्धा जिल्ह्याला लाभली आहे़ निम्न वर्धा, लाल नाला या प्रकल्पांतून याचा प्रत्यय आला़ आता आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पाचेही भिजत घोंगडे कायम आहे़ २००१ मध्ये भूमिपूजन झालेल्या व प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या प्रकल्पाची किंमत वाढतेय; पण प्रकल्पाची प्रतीक्षा संपताना दिसत नाही़वर्धा नदीवर आजनसरा गावानजीक आजनसरा बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पांतर्गत नदीच्या पात्रात दगडी बांधकामात बॅरेज प्रस्तावित आहे़ नदीच्या दोन्ही बाजूला मातीचा बंधारा, बॅरेजच्या वरील बाजूस जॅकवेल, रायझिंग मेन, वितरण हौद व दोन मुख्य कालवे प्रस्तावित आहेत. आजनसरा प्रकल्पास १९९६-९७ च्या दरसुचीनुसार १५८ कोटी २१ लाख रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान आहे. मूळ प्रशासकीय मान्यतेनंतर पाच वर्षे निधी प्राप्त झाला नाही़ यामुळे किंमत वाढली़ नव्याने प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली. या प्रकल्पास राज्य शासनाने २७ नोव्हेंबर २००६ रोजी २००५-०६ च्या दरसुचीनुसार २०८ कोटी ४२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान केली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन ६ एप्रिल २००१ रोजी पार पडले़ सध्या या प्रकल्पाचा सर्वसाधारण आराखडा प्रदेश कार्यालयाकडून ७ फेबु्रवारी २००८ रोजी मंजूर करण्यात आला़ पंपगृहाचा आराखडा मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिककडून तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ३१.५६ हेक्टर वनजमीन बाधित होते. त्याच्या निर्वनीकरणच्या प्रस्तावास २५ एप्रिल ०६ रोजी केंद्र शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली़ त्यानुसार वन विभागाकडून २८ जानेवारी २०१३ रोजी एनपीव्ही व पर्यायी वनीकरणाकरिता ५८३.६० लाख इतक्या रकमेची सुधारित मागणी प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने २३०.३९ लाख इतक्या रकमेचा भरणा वनखात्यास एप्रिल २०११ मध्ये करण्यात आलेला आहे. उर्वरित ३५२.२१ लाख इतक्या रकमेचा भरणा अद्यापही करावयाचा आहे़ याशिवाय केंद्रीय जल आयोग व पर्यावरणाची परवानगी यासह विविध कारणांमुळे अद्यापही आजनसरा बॅरेजचे काम पूढे सरकलेले नाही़ यामुळे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाची प्रतीक्षाच करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांनी लक्ष घेत प्रकल्पाचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे़(कार्यालय प्रतिनिधी)