शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या भावात मोठी घट, डाळींच्या किंमती मात्र जैसे थे

By admin | Updated: November 20, 2015 02:33 IST

तूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली.

बाजारपेठेत तूर सहा हजार रुपयांवर : डाळीच्या दराने सर्वसामान्यांची मात्र दाणादाणफनिंद्र रघाटाटे रोहणातूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली. शासनाने कारवाई करीत साठेबाज व्यापाऱ्यांकडून डाळींचे साठे जप्त केले. परिणामी बाजारातील १४ हजार रुपये प्रति क्विंटल असलेली तूर आता ६ हजार रुपयांवर आली. पण डाळींचे भाव मात्र जैसे थे आहेत. ही विसंगती शासनाच्या महागाई कमी करण्याच्या प्रयत्नाला प्रभावहित ठरणारी असून सर्वसामान्यांच्या तोंडातील सणासुदीच्या काळात डाळींच्या पदार्थांची चव हिरावणारी ठरत आहे. सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांची तूर फेब्रुवारी २०१५ या महिन्यापासून निघायला प्रारंभ झाला. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी तुरी निघाल्याबरोबर विक्रीस काढल्या. त्या काळात तुरीचे दर ४००० -६००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. या काळात तूर डाळीचे दर ७० ते ८० रुपयांदरम्यान होते. एप्रील- मे २०१५ ला महिन्यात शेतकऱ्यांचा हरभरा निघाला. त्याला प्रति क्विंटल ३००० पर्यंत दर मिळाले. चनाडाळ ४० ते ५० रुपये प्रतिकिलो होती. मे २०१५ पर्यंत शेतकऱ्याजवळील तूर व चना व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा झाला. लगेच जादूची कांडी फिरली अन् तुरीची किंमत दररोज प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी वाढत प्रतिक्विंटल १४ हजारांवर पोहोचली. तर चना ५००० रुपयांवर गेला. परिणामी बाजारात तूरडाळ २०० रुपये व चनाडाळ १४० रुपये प्रतिकिलो झाली. अर्थातच या सर्व भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. शेतकरी मात्र या लाभापासून वंचितच राहिला. झालेली भाववाढ पाहून आपण आपले उत्पादन विनाकारण विकले म्हणून तो हळहळला. डाळीतील सदर भाववाढीने सामान्य जनतेत असंतोष उफाळला. विरोधक आक्रमक झाले. शासनाने दखल घेत साठेबाजीमुळेच भाव वाढले म्हणून व्यापाऱ्यांच्या गोदामावर जप्तीची कारवाई करत लाखो क्विंटल डाळी जप्त केल्या. कारवाई होताच अल्पावधीतच तुरीचे भाव गडगडले. तूर ६००० रुपयांवर आली. चना ३५०० रुपयांचा आला. असे झाले तरी डाळीचे दर मात्र शंभराच्यावर कायम आहेत. मुख्यमंत्री डाळींचे भाव कमी झाले असे कितीही सांगत असेल तरी प्रत्यक्षात बाजारात उपरोक्त डाळीसह मूग व मसूर या डाळींचे भाव देखील कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.