शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

तुरीच्या भावात मोठी घट, डाळींच्या किंमती मात्र जैसे थे

By admin | Updated: November 20, 2015 02:33 IST

तूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली.

बाजारपेठेत तूर सहा हजार रुपयांवर : डाळीच्या दराने सर्वसामान्यांची मात्र दाणादाणफनिंद्र रघाटाटे रोहणातूर, मूग, मसूर या व्दिदल धान्याच्या डाळीं १५० ते २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्या. त्यामुळे सामान्य जनतेतून महागाई विरोधात ओरड झाली. शासनाने कारवाई करीत साठेबाज व्यापाऱ्यांकडून डाळींचे साठे जप्त केले. परिणामी बाजारातील १४ हजार रुपये प्रति क्विंटल असलेली तूर आता ६ हजार रुपयांवर आली. पण डाळींचे भाव मात्र जैसे थे आहेत. ही विसंगती शासनाच्या महागाई कमी करण्याच्या प्रयत्नाला प्रभावहित ठरणारी असून सर्वसामान्यांच्या तोंडातील सणासुदीच्या काळात डाळींच्या पदार्थांची चव हिरावणारी ठरत आहे. सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांची तूर फेब्रुवारी २०१५ या महिन्यापासून निघायला प्रारंभ झाला. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी तुरी निघाल्याबरोबर विक्रीस काढल्या. त्या काळात तुरीचे दर ४००० -६००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. या काळात तूर डाळीचे दर ७० ते ८० रुपयांदरम्यान होते. एप्रील- मे २०१५ ला महिन्यात शेतकऱ्यांचा हरभरा निघाला. त्याला प्रति क्विंटल ३००० पर्यंत दर मिळाले. चनाडाळ ४० ते ५० रुपये प्रतिकिलो होती. मे २०१५ पर्यंत शेतकऱ्याजवळील तूर व चना व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा झाला. लगेच जादूची कांडी फिरली अन् तुरीची किंमत दररोज प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी वाढत प्रतिक्विंटल १४ हजारांवर पोहोचली. तर चना ५००० रुपयांवर गेला. परिणामी बाजारात तूरडाळ २०० रुपये व चनाडाळ १४० रुपये प्रतिकिलो झाली. अर्थातच या सर्व भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. शेतकरी मात्र या लाभापासून वंचितच राहिला. झालेली भाववाढ पाहून आपण आपले उत्पादन विनाकारण विकले म्हणून तो हळहळला. डाळीतील सदर भाववाढीने सामान्य जनतेत असंतोष उफाळला. विरोधक आक्रमक झाले. शासनाने दखल घेत साठेबाजीमुळेच भाव वाढले म्हणून व्यापाऱ्यांच्या गोदामावर जप्तीची कारवाई करत लाखो क्विंटल डाळी जप्त केल्या. कारवाई होताच अल्पावधीतच तुरीचे भाव गडगडले. तूर ६००० रुपयांवर आली. चना ३५०० रुपयांचा आला. असे झाले तरी डाळीचे दर मात्र शंभराच्यावर कायम आहेत. मुख्यमंत्री डाळींचे भाव कमी झाले असे कितीही सांगत असेल तरी प्रत्यक्षात बाजारात उपरोक्त डाळीसह मूग व मसूर या डाळींचे भाव देखील कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.