शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

उदरनिर्वाहासाठी होते २४ किमी पायपीट

By admin | Updated: March 30, 2015 01:42 IST

गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही.

लोकमत  मदतीचा हातसचिन देवतळे विरूळ (आ़)गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही. म्हातारपणात आपल्या मुलांकडून दोन वेळचे जेवण मिळावे, एवढीच अपेक्षा घेऊन अनेक वृद्ध माता-पिता जगत असतात; पण म्हातारपणात सोबतीला कुणीच नसेल तर पोटाची खळगी भरण्यासाठी असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. अशाच ८० वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उदरनिर्वाहासाठी २४ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले आहे़दहेगाव येथील खुशाल धकाते (८०) व त्यांची वृद्ध पत्नी छबू धकाते (७०) या दाम्पत्यांना मुल नाही. दोन मुली होत्या. यात एका मुलीचे निधन झाले तर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले; पण नवरा सतत मद्यधुंद अवस्थेत मारहाण करीत असल्याने ती दहेगावला आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आधाराने जीवन जगत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य, राहायला लहानसे घर असले तरी एवढ्या कुटुंबाचा भार ८० वर्षीय खुशाल यांना पेलावा लागतो़ संसाराचा गाडा हाकण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याची सकाळी ४ वाजतापासून पायपीट सुरू होते. खुशाल व पत्नी छबू हे दहेगाव येथून १२ किमी पायदळ प्रवास करून दोघेही डोक्यावर मोळी घेऊन काठीच्या आधारे थरथरत्या अंगाने पुलगावला जातात़ पुलगाव येथे दोघांचीही मोळी १०० रुपयांत विकून ते परत दहेगावला पायदळ जातात. हे दृष्य पुलगाव ते दहेगाव मार्गावर पाहायला मिळते. वार्धक्यामुळे कोणतेच काम होत नाही; पण नाईलाज असल्याने या वयातही त्यांना काम करावेच लागते आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. निराधार वृद्धांकरिता शासनाकडून अनेक चांगल्या योजना राबविल्या जातात; पण या वृद्ध दाम्पत्यांना अद्याप शासनाच्या एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. साध्या निराधार योजनेतील अनुदानही त्यांना प्राप्त होत नाही. निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेकांकडे आपली कैफियत मांडली; पण नेत्यांसह सर्वांनीच त्याकडे पाठ फिरविली. कुणीही त्यांना मदत केली नाही. आज गरज नसलेल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे; पण या गरीब, वृद्ध दाम्पत्याना निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल़खुशाल व त्यांच्या पत्नीचे शरीर वार्धक्यामुळे पूर्णत: खंगले आहे. चालणे होत नाही. चालताना थकवा येतो. बसत-बसत पुलगाव ते दहेगाव हा बारा किमी जाणे व परत येणे, हा प्रवास त्यांना डोक्यावर मोळीचे ओझे घेऊन करावा लागतो़ हे दृश्य सर्वांच्या नजरेस पडते; पण कुणीही त्यांच्या मदतीला समोर येताना दिसत नाही़ या वृद्ध दाम्पत्याला कुणीतरी मदतीचा हात देऊन किमान शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे झाले आहे़