शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

उदरनिर्वाहासाठी होते २४ किमी पायपीट

By admin | Updated: March 30, 2015 01:42 IST

गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही.

लोकमत  मदतीचा हातसचिन देवतळे विरूळ (आ़)गरिबी हा माणसाला लागलेला शाप आहे. पोटाची आग माणसाला शांत बसू देत नाही. मरेपर्यंत पोटाची भुक शमविण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात़ यात म्हातारपण आले की, थकलेल्या शरीराने श्रम होत नाही. म्हातारपणात आपल्या मुलांकडून दोन वेळचे जेवण मिळावे, एवढीच अपेक्षा घेऊन अनेक वृद्ध माता-पिता जगत असतात; पण म्हातारपणात सोबतीला कुणीच नसेल तर पोटाची खळगी भरण्यासाठी असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. अशाच ८० वर्षीय वृद्ध दाम्पत्याला उदरनिर्वाहासाठी २४ किमीची पायपीट करावी लागत असल्याचे समोर आले आहे़दहेगाव येथील खुशाल धकाते (८०) व त्यांची वृद्ध पत्नी छबू धकाते (७०) या दाम्पत्यांना मुल नाही. दोन मुली होत्या. यात एका मुलीचे निधन झाले तर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले; पण नवरा सतत मद्यधुंद अवस्थेत मारहाण करीत असल्याने ती दहेगावला आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आधाराने जीवन जगत आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य, राहायला लहानसे घर असले तरी एवढ्या कुटुंबाचा भार ८० वर्षीय खुशाल यांना पेलावा लागतो़ संसाराचा गाडा हाकण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याची सकाळी ४ वाजतापासून पायपीट सुरू होते. खुशाल व पत्नी छबू हे दहेगाव येथून १२ किमी पायदळ प्रवास करून दोघेही डोक्यावर मोळी घेऊन काठीच्या आधारे थरथरत्या अंगाने पुलगावला जातात़ पुलगाव येथे दोघांचीही मोळी १०० रुपयांत विकून ते परत दहेगावला पायदळ जातात. हे दृष्य पुलगाव ते दहेगाव मार्गावर पाहायला मिळते. वार्धक्यामुळे कोणतेच काम होत नाही; पण नाईलाज असल्याने या वयातही त्यांना काम करावेच लागते आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. निराधार वृद्धांकरिता शासनाकडून अनेक चांगल्या योजना राबविल्या जातात; पण या वृद्ध दाम्पत्यांना अद्याप शासनाच्या एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. साध्या निराधार योजनेतील अनुदानही त्यांना प्राप्त होत नाही. निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी अनेकांकडे आपली कैफियत मांडली; पण नेत्यांसह सर्वांनीच त्याकडे पाठ फिरविली. कुणीही त्यांना मदत केली नाही. आज गरज नसलेल्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत आहे; पण या गरीब, वृद्ध दाम्पत्याना निराधार योजनेचा लाभ मिळू नये, हे दुर्दैवच म्हणावे लागेल़खुशाल व त्यांच्या पत्नीचे शरीर वार्धक्यामुळे पूर्णत: खंगले आहे. चालणे होत नाही. चालताना थकवा येतो. बसत-बसत पुलगाव ते दहेगाव हा बारा किमी जाणे व परत येणे, हा प्रवास त्यांना डोक्यावर मोळीचे ओझे घेऊन करावा लागतो़ हे दृश्य सर्वांच्या नजरेस पडते; पण कुणीही त्यांच्या मदतीला समोर येताना दिसत नाही़ या वृद्ध दाम्पत्याला कुणीतरी मदतीचा हात देऊन किमान शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे झाले आहे़