शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोककला टिकविण्याकरिता सकारात्मक पाऊल हवे

By admin | Updated: April 1, 2017 01:24 IST

लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.

गणेश चंदनशिवे : प्रकट मुलाखतीद्वारे साधला संवाद वर्धा : लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. गायन करतांना आलेल्या विविध अडचणींवर मात करीत आपण पुढाकार घेतला आणि आजपर्यंतचा पल्ला गाठता आला. प्रकट मुलाखतीदरम्यान डॉ . गणेश चंदनशिवे श्रोत्यांशी संवाद साधत होते. यावेळी संवाहक म्हणून डॉ. सतीश पावडे यांनी त्यांना बोलके केले. लोककलेचे उपासक आणि अभ्यासक असलेले आणि बाजीराव मस्तानी चित्रपटात मराठी लावणीची टाकणी आपल्या अनवट आवाजात सादर करणारे गायक डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी श्रोत्यांना लोककला व संस्कृतीतील गायनाविषयी अनेक अनभिज्ञ गोष्टी सांगितल्या. लावणी म्हणजे केवळ शृंगार हा अपसमज आहे. हा लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. लावणीच्या माध्यमातून आजवर समाज प्रबोधनाचे काम झाले आहे. लावणी ही तत्त्व आणि आध्यात्म सांगणारी आहे. आध्यात्माची जोड दिल्याने संत परंपरेतील अनेकांनी लावणीला सन्मान मिळवून दिला आहे , हे त्यांनी अनेक उदाहणे देत यावेळी स्पष्ट केले. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदीप दाते यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रकट मुलाखतीमध्ये चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. डॉ. सतीश पावडे यांनी प्रकट मुलाखत घेऊन विविध प्रश्नांची उकल करवून घेतली. भारूड, गौळण, लावणी सादर करून श्रोत्यांनाही चंदनशिवे यांनी मंत्रमुग्ध केले. लोककला आणि लोकसंस्कृती जिवंत ठेण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीने लोककलांकडे पहिले पाहिजे, लोककला जिवंत ठेवण्यासाठी सर्व साहित्य आणि कलेच्या विचाराची लोकं एकत्र आली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. या मुलाखतीमध्ये गायनाचे विविध पैलू डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या मुलाखतीमधून उलगडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश कदम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, इप्टा वर्धाचे अध्यक्ष राजू बावणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप दाते यांनी तर संचालन डॉ स्मिता वानखेडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. चंदनशिवे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रदीप दाते यांच्या हस्ते वर्धेकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकरिता मेघा देशमुख, रंजना दाते, सतीश सुपारे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळिले, आकाश दाते आणि आलोक निगम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.(प्रतिनिधी)