शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोककला टिकविण्याकरिता सकारात्मक पाऊल हवे

By admin | Updated: April 1, 2017 01:24 IST

लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.

गणेश चंदनशिवे : प्रकट मुलाखतीद्वारे साधला संवाद वर्धा : लोककला आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. गायन करतांना आलेल्या विविध अडचणींवर मात करीत आपण पुढाकार घेतला आणि आजपर्यंतचा पल्ला गाठता आला. प्रकट मुलाखतीदरम्यान डॉ . गणेश चंदनशिवे श्रोत्यांशी संवाद साधत होते. यावेळी संवाहक म्हणून डॉ. सतीश पावडे यांनी त्यांना बोलके केले. लोककलेचे उपासक आणि अभ्यासक असलेले आणि बाजीराव मस्तानी चित्रपटात मराठी लावणीची टाकणी आपल्या अनवट आवाजात सादर करणारे गायक डॉ. गणेश चंदनशिवे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी श्रोत्यांना लोककला व संस्कृतीतील गायनाविषयी अनेक अनभिज्ञ गोष्टी सांगितल्या. लावणी म्हणजे केवळ शृंगार हा अपसमज आहे. हा लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. लावणीच्या माध्यमातून आजवर समाज प्रबोधनाचे काम झाले आहे. लावणी ही तत्त्व आणि आध्यात्म सांगणारी आहे. आध्यात्माची जोड दिल्याने संत परंपरेतील अनेकांनी लावणीला सन्मान मिळवून दिला आहे , हे त्यांनी अनेक उदाहणे देत यावेळी स्पष्ट केले. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रदीप दाते यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रकट मुलाखतीमध्ये चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. डॉ. सतीश पावडे यांनी प्रकट मुलाखत घेऊन विविध प्रश्नांची उकल करवून घेतली. भारूड, गौळण, लावणी सादर करून श्रोत्यांनाही चंदनशिवे यांनी मंत्रमुग्ध केले. लोककला आणि लोकसंस्कृती जिवंत ठेण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टीने लोककलांकडे पहिले पाहिजे, लोककला जिवंत ठेवण्यासाठी सर्व साहित्य आणि कलेच्या विचाराची लोकं एकत्र आली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. या मुलाखतीमध्ये गायनाचे विविध पैलू डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आपल्या मुलाखतीमधून उलगडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश कदम तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, इप्टा वर्धाचे अध्यक्ष राजू बावणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप दाते यांनी तर संचालन डॉ स्मिता वानखेडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. चंदनशिवे यांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन प्रदीप दाते यांच्या हस्ते वर्धेकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकरिता मेघा देशमुख, रंजना दाते, सतीश सुपारे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळिले, आकाश दाते आणि आलोक निगम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.(प्रतिनिधी)