शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

‘जगाच्या पाठीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती झाली नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:31 IST

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : ‘आॅगस्ट क्रांती दिन चले जाव’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला या पवित्र भूमीत आपण आलो आहो. ‘चले जाव’चा नारा याच भूमीतून गांधीजींनी देशवासीयांना दिला. अहिंसेच्या माध्यमातून लोकशक्ती निर्माण करून न्याय, समता, शांती प्रस्थापित करण्यासाठी जीवन समर्पित केले. गांधीजींच्या आवाहनावर प्रचंड शक्तीनिशी देशवासी उभे राहत होते. जगाच्या पातळीवर गांधीजींसारखी लोकलढा उभारणारी व्यक्ती आजपर्यंत झाली नाही, असे मत जेष्ठ पत्रकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.गांधी १५० जयंती अभियानांतर्गत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानद्वारे यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहात आॅगस्ट क्रांती चलेजाव अमृतवर्ष सभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, माजी अध्यक्ष अ‍ॅड. मा.म. गडकरी उपस्थित होते. गांधीजींच्या प्रतिमेला द्वादशीवार यांनी सूतमाळ अर्पण केल्यानंतर खादी शाल, सूतमाळ व खादी वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.द्वादशीवार पूढे म्हणाले की, स्वराज्यातून सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण आयुष्य मावळ्यांना सोबत घेऊन महाराज लढले. लढत राहिले; पण महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी राजेही १७ वर्षे औरंगजेबाशी लढले. ते फक्त शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमुळेच! जगाच्या इतिहासानेही याची दखल घेतली. १९४२ चा लढा हा सर्वात मोठा होता. सबंध देश एकजूट झाला होता. प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी मरायला तयार होता आणि या मागे गांधीजींची पे्ररणा, शक्ती होती. कुठलाही अधिकार नाही, सत्ता नाही, नंगा फकीर होते; पण लोकांचा प्रचंड विश्वास गांधीजींवर होता. यामुळेच अहिंसेचे तत्त्व आंदोलनात दिसते. गांधीजींचे जीवन तत्त्व व मूल्यावर आधारित होते. यामुळे अहिंसेची लोकशक्ती यशस्वी झाली.सावरकर अंदमानात असताना त्यांच्या मुक्ततेसाठी गांधीजींनी प्रयत्न केले. शत्रूशी मैत्री करण्याची शिकवण बापूंनी कार्यकर्त्यांना दिली; पण सावरकरांनी गांधीद्वेष कायम जपला. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती. ती चुकीची होती; पण कायदा व संविधानाच्या चौकटीत. हल्लीच्या सरकारमध्ये ते मूल्य दिसत नाही.सरकार टोळीप्रमाणे कार्य करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या मागे तरूण वर्ग होता. हा वर्ग विचार, मूल्य आणि कृतीवर प्रेरित झाला होता. आज गांधीजींचे विचार, मूल्य तरूणांपर्यंत पोहोचविलेच जात नाही. यामुळे तरूण गांधी विचारांपासून दूर आहे. आश्रम व परिसराचे विचार व मूल्य जपण्याचे दायित्व आहे. महान आत्म्याचे स्मरण या दिवशी सर्वांना प्रेरणा ठेणारे ठरेल, असेही ते म्हणाले.प्रास्ताविक जयवंत मठकर व संचालन प्रशांत गुजरकर यांनी केले तर आभार डॉ. सोहम पंड्या यांनी मानले.