शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

गणेशोत्सवाच्या नावावर प्रदूषण नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:24 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा सर्व्हे : नागरिक म्हणतात धार्मिक ऐवजी सामाजिक उद्देश असावा

श्रेया केने।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाची आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्थापना झाली. बाप्पाच्या आगमनानिमित्त गणेशोत्सवाचे स्वरूप जाणून घेण्याकरिता ‘लोकमत’च्यावतीने ‘आपल्या कल्पनेतील सार्वजनिक गणेशोत्सव’ हा सर्व्हे करण्यात आला. वर्धेत नागरिकांचा कल गणेशोत्सवात सामाजिक उद्देशाचा दिसला तर ९० टक्के लोक गणेशोत्सवादरम्यान होणाºया ध्वनी, वायू व जल प्रदूषणाच्या विरोधात असल्याचे दिसून आले.शहरातील अनेक ठिकाणी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दहा दिवस चालणाºया या उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. यानिमित्त ‘लोकमत’च्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण १० प्रश्न विचारण्यात आले. प्राथमिक स्वरूपात असलेल्या शंभर नागरिकांकडून सर्व्हेचा अर्ज भरून घेण्यात आला. हे सर्वेक्षण करताना काही ठिकाणी गणेशोत्सवाच्या नावावर होत असलेल्या गोंधळाला नागरिकांकडूनही विरोध असल्याचे दिसून आले. विनाकारण होत असलेला आवाज आणि युवकांचा हुल्लड यामुळे या उत्सवाचे सामाजिक महत्त्व कमी होत असल्याच्या प्रतिक्रीया अनेकांकडून भरलेल्या अर्जातून उमटल्या.शासनाच्यावतीने नुकताच डिजेच्या आवाजावर प्रतिबंध लावण्यात आला. हा प्रतिबंध योग्य असल्याचे ९० टक्के नागरिक म्हणत आहेत. गणेशोत्सवानंतर होत असलेल्या विसर्जनातून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यातून सुटका करण्याकरिता पर्यावरणपुरक गणेशोत्सव व्हावा असेही ९० टक्के नागरिकांनी त्यांच्या अर्जातून स्पष्ट केले आहे. उत्सवादरम्यान होत असलेली आतिषबाजी आणि त्यातून होणारे वायू प्रदूषण टाळावे असे ८५ टक्के नागरिकांनी या सर्वेक्षणातून म्हटले आहे.एक गाव एक गणपतीला अनेकांची पसंतीशासनाच्यावतीने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अंमलात आणली. या संकल्पनेला प्रारंभी प्रतिसाद मिळाला. कालांतराने त्यात फरक पडला. ही संकल्पना पुन्हा उदयास येत आहे. ही संकल्पना नागरिकांना पटली असून त्यांच्याकडून हा प्रकार प्रत्येक गावात व्हावा असा कल दिसून आला. या सर्वेक्षणात ७० टक्के नागरिकांनी या संकल्पनेला पसंती दिल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.हरविलेला सामाजिक उद्देश कायम असावागणेशोत्सव मुळातच धार्मिक नाही तर सामाजिक उद्देशाने उदयास आला आहे. मात्र आज त्याला धार्मिक रंग चढत आहे. टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीकरिता मोठ्या प्रमाणात या उत्सवाला चालना दिली होती. आज तो रंग हरवित असून त्याच उद्देशाने हा उत्सव साजरा होण्याची अनेकांची अपेक्षा दिसून आली.उत्सवादरम्यान होणारा अनावश्यक खर्च टाळागणेशोत्सवादरम्यान अनेक बाबींवर अनावश्यक खर्च होत आहे. यातूनच डीजे, फटाके यासारखे प्रकार घडतात. आता शासनाने वर्गनीपैकी १० टक्के रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मंडळांनी उत्सवारदम्यान होणारा अनावश्यक खर्च टाळावा, अशा प्रतिक्रीया अनेकांकडून उमटल्या आहेत.