शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतात संत्रा नाही, तरीही १२ हजारांची मदत

By admin | Updated: November 25, 2014 22:59 IST

अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून

कृषी सहायकाचा कारभार: पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित अमोल सोटे - आष्टी (शहीद)अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून भलताच प्रकार उजेडात आला. तालुक्यातील रानवाडीमध्ये सरिता मनोहर सावरकर या महिला शेतकऱ्याच्या शेतात संत्रा नसतानाही तिला १२ हजार रुपयांची मदत देण्याचा अफलातून प्रकार कृषी विभागाने केला आहे. जळगाव (बेलोरा) मधील शेतकरी विनोद पत्रे यांनी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या गहू व चणा पिकाची भरपाई मागण्यासाठी कृषी विभागाकडे विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी एकूण दहा शेतकऱ्यांची मदत इलाहाबाद बँक शाखा वर्धमनेरी येथे पाठविल्याची माहिती दिली. यानंतर शेतकरी नामदेव भातुकलाल, सरिता सावरकर, शंकर अजानकर, वासुदेव आजनकर, राजेंद्र डहाके, विलास भांगे, भीमराव भांगे, जनार्दन आजनकर आणि विनोद पत्रे हे सर्व शेतकरी विड्रॉल करण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी चुकीचा खाते क्रमांक कृषी विभागाने दिल्यामुळे आम्ही रक्कम देवू शकत नाही, असे सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी विनोद पत्रे यांनी खाते क्रमांक तपासला यात कृषी अधिकाऱ्यांनी चुकीचा क्रमांक पाठविला असल्याचे यादीवरून सिद्ध झाले. त्यानंतर सर्व शेतकरी तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांना भेटले. त्यांनी यादी दुरुस्त करण्याचे संबंधित कृषीसहायकाला सांगितले; परंतु यादी दुरुस्त झालीच नाही. त्यामुळे इलाहाबाद बँकेच्या अधिकाऱ्याने आष्टीच्या बँक आॅफ इंडियात यादी पाठविली. सदर यादीचा बँक आॅफ इंडिया शाखेशी संबंध नसल्याने व्यवस्थापकांनी खाते क्रमांक चुकीचा असून सर्व रक्कम कृषी विभागाच्या खात्यात परत पाठविली. तरीदेखील कृषी विभागाने परत इलाहाबाद बँकेला पत्र पाठवून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सल्ला दिला. यादी सदोष असल्यामुळे खात्यात पैसे जमा होवूच शकत नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी ठणकाहून सांगितले. हा सगळा प्रकार सहा महिन्यापासून सुरू आहे. या बाबत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले होते.