शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

शेतात संत्रा नाही, तरीही १२ हजारांची मदत

By admin | Updated: November 25, 2014 22:59 IST

अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून

कृषी सहायकाचा कारभार: पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित अमोल सोटे - आष्टी (शहीद)अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून भलताच प्रकार उजेडात आला. तालुक्यातील रानवाडीमध्ये सरिता मनोहर सावरकर या महिला शेतकऱ्याच्या शेतात संत्रा नसतानाही तिला १२ हजार रुपयांची मदत देण्याचा अफलातून प्रकार कृषी विभागाने केला आहे. जळगाव (बेलोरा) मधील शेतकरी विनोद पत्रे यांनी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या गहू व चणा पिकाची भरपाई मागण्यासाठी कृषी विभागाकडे विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी एकूण दहा शेतकऱ्यांची मदत इलाहाबाद बँक शाखा वर्धमनेरी येथे पाठविल्याची माहिती दिली. यानंतर शेतकरी नामदेव भातुकलाल, सरिता सावरकर, शंकर अजानकर, वासुदेव आजनकर, राजेंद्र डहाके, विलास भांगे, भीमराव भांगे, जनार्दन आजनकर आणि विनोद पत्रे हे सर्व शेतकरी विड्रॉल करण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी चुकीचा खाते क्रमांक कृषी विभागाने दिल्यामुळे आम्ही रक्कम देवू शकत नाही, असे सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी विनोद पत्रे यांनी खाते क्रमांक तपासला यात कृषी अधिकाऱ्यांनी चुकीचा क्रमांक पाठविला असल्याचे यादीवरून सिद्ध झाले. त्यानंतर सर्व शेतकरी तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांना भेटले. त्यांनी यादी दुरुस्त करण्याचे संबंधित कृषीसहायकाला सांगितले; परंतु यादी दुरुस्त झालीच नाही. त्यामुळे इलाहाबाद बँकेच्या अधिकाऱ्याने आष्टीच्या बँक आॅफ इंडियात यादी पाठविली. सदर यादीचा बँक आॅफ इंडिया शाखेशी संबंध नसल्याने व्यवस्थापकांनी खाते क्रमांक चुकीचा असून सर्व रक्कम कृषी विभागाच्या खात्यात परत पाठविली. तरीदेखील कृषी विभागाने परत इलाहाबाद बँकेला पत्र पाठवून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सल्ला दिला. यादी सदोष असल्यामुळे खात्यात पैसे जमा होवूच शकत नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी ठणकाहून सांगितले. हा सगळा प्रकार सहा महिन्यापासून सुरू आहे. या बाबत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले होते.