शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:09 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला.

ठळक मुद्देरामदास तडस : स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला. काँगे्रेसने सहा दशकापेक्षा अधिक काळ सत्ता भोगली; पण आमचा तालुका उपेक्षितच राहिला शहरात एक मोठा उद्योग होता. त्याची मुरमुºयाच्या भावात विक्री करून कामगारांना रस्त्यावर आणले. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा, स्मशानभूमीसह तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. पुलगाव-आमला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्याचे लवकर काम सुरू होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेतील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. उद्घाटक म्हणून म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीतल संजय गाते, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष केशव दांडेकर, म.रा. सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू, जेठानंद राजपूत हिंगणघाट, जयंत तलमले, विजय निवल, संस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.देशातील सहकार क्षेत्रातील सम्राटांनी सहकार क्षेत्राचा दर्जा उंचविण्यापेक्षा दर्जा घसरविण्याचे काम केले. यामुळे आज देशातील सहकार चळवळ आजारी पडली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणारे सहकारी पतसंस्थेतील सभासद, संचालक, कर्मचारी व समाज हे सहकारी पतसंस्थेचे चार खांब आहेत. या चारही खांबांवर पतसंस्थेची इमारत उभी असते. सर्वसामान्य माणूसही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सहकारी पतसंस्थांकडे अधिक वळतो. सहकारी चळवळ मजबूत करून ती तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार क्षेत्राला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची गरज आहे. आजच्या तरूण पिढीने त्यांचे विचार व त्याग आत्मसात करून पतसंस्थांनी खातेदार व सभासदाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.खा. तडस व ना. चरेगावकर यांचा पतसंस्थेद्वारे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनीता महिला बचत गट, शोभा महिला बचत गट, अर्चना महिला बचत गट व मीना महिला बचत गटांना खा. तडस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर तडस यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयासाठी खासदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर ओक यांनी केले. मान्यवरांचा परिचय अजय बोबडे यांनी करून दिला. वैशाली पोहरे यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शैलजा सुदाम यांनी केले तर आभर व्यवस्थापक विजय साकरे यांनी मानले. कार्यक्रमालीा अशोक पनपालिया, नितीन बडगे, विरेंद्र धोपाडे, बबन बरवड, डॉ. प्रकाश हणमंते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.