शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:09 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला.

ठळक मुद्देरामदास तडस : स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला. काँगे्रेसने सहा दशकापेक्षा अधिक काळ सत्ता भोगली; पण आमचा तालुका उपेक्षितच राहिला शहरात एक मोठा उद्योग होता. त्याची मुरमुºयाच्या भावात विक्री करून कामगारांना रस्त्यावर आणले. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा, स्मशानभूमीसह तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. पुलगाव-आमला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्याचे लवकर काम सुरू होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेतील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. उद्घाटक म्हणून म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीतल संजय गाते, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष केशव दांडेकर, म.रा. सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू, जेठानंद राजपूत हिंगणघाट, जयंत तलमले, विजय निवल, संस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.देशातील सहकार क्षेत्रातील सम्राटांनी सहकार क्षेत्राचा दर्जा उंचविण्यापेक्षा दर्जा घसरविण्याचे काम केले. यामुळे आज देशातील सहकार चळवळ आजारी पडली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणारे सहकारी पतसंस्थेतील सभासद, संचालक, कर्मचारी व समाज हे सहकारी पतसंस्थेचे चार खांब आहेत. या चारही खांबांवर पतसंस्थेची इमारत उभी असते. सर्वसामान्य माणूसही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सहकारी पतसंस्थांकडे अधिक वळतो. सहकारी चळवळ मजबूत करून ती तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार क्षेत्राला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची गरज आहे. आजच्या तरूण पिढीने त्यांचे विचार व त्याग आत्मसात करून पतसंस्थांनी खातेदार व सभासदाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.खा. तडस व ना. चरेगावकर यांचा पतसंस्थेद्वारे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनीता महिला बचत गट, शोभा महिला बचत गट, अर्चना महिला बचत गट व मीना महिला बचत गटांना खा. तडस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर तडस यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयासाठी खासदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर ओक यांनी केले. मान्यवरांचा परिचय अजय बोबडे यांनी करून दिला. वैशाली पोहरे यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शैलजा सुदाम यांनी केले तर आभर व्यवस्थापक विजय साकरे यांनी मानले. कार्यक्रमालीा अशोक पनपालिया, नितीन बडगे, विरेंद्र धोपाडे, बबन बरवड, डॉ. प्रकाश हणमंते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.