शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

शहरात एकही मोठा उद्योग नाही ही शोकांतिकाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:09 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला.

ठळक मुद्देरामदास तडस : स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जिल्ह्यातील सेवाग्रामची निवड करून १५ वर्षे स्वातंत्र्याचा लढा चालविला. काँगे्रेसने सहा दशकापेक्षा अधिक काळ सत्ता भोगली; पण आमचा तालुका उपेक्षितच राहिला शहरात एक मोठा उद्योग होता. त्याची मुरमुºयाच्या भावात विक्री करून कामगारांना रस्त्यावर आणले. या शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा, स्मशानभूमीसह तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. पुलगाव-आमला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रेल्वेलाईनमध्ये रुपांतर करण्याचा प्रश्न मार्गी लागला असून त्याचे लवकर काम सुरू होईल, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेतील स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून बोलत होते. उद्घाटक म्हणून म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीतल संजय गाते, वर्धा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष केशव दांडेकर, म.रा. सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू, जेठानंद राजपूत हिंगणघाट, जयंत तलमले, विजय निवल, संस्थेचे अध्यक्ष सुरेश गणेशपुरे, उपाध्यक्ष प्रदीप पांडे आदी उपस्थित होते.देशातील सहकार क्षेत्रातील सम्राटांनी सहकार क्षेत्राचा दर्जा उंचविण्यापेक्षा दर्जा घसरविण्याचे काम केले. यामुळे आज देशातील सहकार चळवळ आजारी पडली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणारे सहकारी पतसंस्थेतील सभासद, संचालक, कर्मचारी व समाज हे सहकारी पतसंस्थेचे चार खांब आहेत. या चारही खांबांवर पतसंस्थेची इमारत उभी असते. सर्वसामान्य माणूसही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा सहकारी पतसंस्थांकडे अधिक वळतो. सहकारी चळवळ मजबूत करून ती तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार क्षेत्राला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची, त्यांच्या त्यागाची गरज आहे. आजच्या तरूण पिढीने त्यांचे विचार व त्याग आत्मसात करून पतसंस्थांनी खातेदार व सभासदाचा विश्वास संपादन केला पाहिजे, असे मत म.रा. सहकार परिषद पुणेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.खा. तडस व ना. चरेगावकर यांचा पतसंस्थेद्वारे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुनीता महिला बचत गट, शोभा महिला बचत गट, अर्चना महिला बचत गट व मीना महिला बचत गटांना खा. तडस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तर तडस यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयासाठी खासदार फंडातून पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर ओक यांनी केले. मान्यवरांचा परिचय अजय बोबडे यांनी करून दिला. वैशाली पोहरे यांनी स्वागत गीत सादर केले. संचालन शैलजा सुदाम यांनी केले तर आभर व्यवस्थापक विजय साकरे यांनी मानले. कार्यक्रमालीा अशोक पनपालिया, नितीन बडगे, विरेंद्र धोपाडे, बबन बरवड, डॉ. प्रकाश हणमंते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.