शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

उपवनसंरक्षक कार्यालयात ‘शिवाजी’ची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:53 IST

सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे.

ठळक मुद्देवाघ बेपत्ता प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर उलगडले सत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील बोर जंगल परिसरात २०१४ पूर्वी वास्तव राहिलेल्या टी-४ ‘शिवाजी’ नामक वाघाची माहितीच उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याचे वास्तव जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीअंती पुढे आले आहे. विशेष म्हणजे, २०१२ पासून शिवाजी नामक वाघ बेपत्ता आहे. शिवाय तो बेपत्ता असल्याचा विषय ‘लोकमत’ने २६ फेबु्रवारीला ‘बाजीरावशी झुंज देणारा शिवाजी बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्तप्रकाशित करून उजेडात आणला होता. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी हा वाघ नेमका कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.शिवाजी नामक वाघाचे दर्शन २०१२ मध्ये गरमसूरच्या पलीकडील जंगलात काही नागरिकांना झाले होते. शिवाय, तो वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरातही कैद झाल्याचे बोलले जाते. असे असले तरी हा वाघ मागील काही वर्षांपासून बेपत्ताच आहे. परिणामी, त्याचे वास्तव्य सध्या कुठल्या परिसरात आहे किंवा त्याची शिकार तर झाली नाही ना, असे अनेक प्रश्न वन्यजीव अभ्यासकांकडून सध्या उपस्थित केले जात आहे. २६ फेब्रुवारी २०१९ ला प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते विकास दांडगे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून या प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी उपवनसंरक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. तेव्हा उपवनसंरक्षक कार्यालयात टी-४ शिवाजी नामक वाघाची माहितीच नसल्याचे पुढे आले आहे. तसे लेखी पत्रही ३१ मे २०१९ रोजी उपवनसंरक्षकांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे.शिवाय पुढील कार्यवाहीसाठी पत्राची एक प्रत विभागीय वन अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांना पाठविण्यात आली आहे. पुढे हे प्रकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.२०१२ नंतर दर्शन नाहीचबोर अभयारण्याला बोर व्याघ्र प्रकल्प म्हणून २०१४ मध्ये घोषित करण्यात आले. त्यावेळी वाघांची सहज ओळख पटावी म्हणून त्यांना नावही देण्यात आली. त्यावेही अंबिका नामक वाघिणीला बीटीआर टी-१, बाजीराव नामक वाघाला बीटीआर टी-२ तर कॅटरिना नामक वाघिणीला बीटीआर टी-३ असे नाव देण्यात आले. शिवाय, शिवाजी नामक वाघाला बीटीआर टी-४ नाव देण्यात आले होते. परंतु, सध्या त्याची नोंदच नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय २०१२ पासून त्याचे दर्शनही झाले नसल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :Tigerवाघ