शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दहा दिवसांपासून बीपीच्या गोळ्याच नाही

By admin | Updated: September 22, 2016 01:13 IST

६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण

आजार बळावले : रुग्णांना आर्थिक भुर्दंडकारंजा(घा.) : ६० गावांचा व्याप आणि जवळपास एक लाख लोकसंख्या असलेल्या कारंजा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात १० दिवसापासून बी.पी. (रक्तदाब) च्या गोळ्यांचा पत्ताच नाही. परिणामी रूग्णांना बाहेरून गोळ्या आणाव्या लागतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात सर्वत्र संसर्गजन्य आजाराच्या रूग्णात झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण रूग्णालयात बाह्य रूग्णांची संख्या दररोज ५०० ते ६०० च्या आसपास आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांतही गर्दी आहे. रूग्णांमध्ये टायफाईड सदृष्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यातच मागील सहा महिन्यांपासून शासनाकडून बी.पी.च्या औषधीचा (गोळ्यांचा) पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. स्थानिक स्तरावर बी.पी.च्या गोळ्यांची खरेदी करून रूग्णांना पुरविण्यात आल्या. परंतु १० दिवसांपासून स्थानिक फंड शिल्लक नसल्यामुळे बी.पी. च्या गोळ्या खरेदी करता आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे या गोळ्या खरेदी करण्याचे अधिकारही स्थानिक स्तरावर नसल्याचेही सांगण्यात येत आहे. वेळोवेळी सदर औषधीची आॅनलाईन मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पण पुरवठा झाला नाही. येत्या दोन-तीन दिवसात कमी क्षमतेच्या २.५ एमजी च्या गोळ्या प्राप्त होतील, असेही स्थानिक व्यवस्थापनाने सांगितले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादे हे काही कामाकरिता ३० सप्टेंबर पर्यंत सुट्टीवर आहेत. त्यामुळे डॉ. प्रभाकर वंजारी हे प्रभार सांभाळत आहेत. सर्पदंश व कुत्रा चावल्यावर उपयोगात येत असलेल्या औषधीचा भरपूर साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी आवश्यक असल्येल्या बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. शासनाने त्वरित बी.पी. इतर प्रकारच्या आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा करावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल व बाहेरून महागडी औषधी विकत घ्यावी लागण्यात नाही अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)