शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यासाठी अंतराची अट नाही

By admin | Updated: May 12, 2016 02:20 IST

जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबत अंतराची कोणतीही अट नाही.

चित्रा रणनवरे : शिक्षणाधिकाऱ्यांनी तक्रारी निकाली काढाव्यातवर्धा : जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबत अंतराची कोणतीही अट नाही. इतर आवश्यक निकष पूर्ण करीत असल्यास आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होत नसल्यास संबंधित शाळांनी वर्ग जोडण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जि.प. अध्यक्ष चित्रा विरेंद्र रणनवरे यांनी दिल्या आहेत.शिक्षण हक्क कायद्यात परिच्छेद १ कलम २ (एफ) नुसार प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण, अशी व्याख्या आहे. इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक व इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक असणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्तानिहाय संरचना असण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २८ आॅगस्ट २०१५ ला शासन निर्णय काढला. यातील मुद्दा क्र. ११ नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत इयत्ता चवथीनंतर पाचवी व सातवीनंतर आठवीचा वर्ग असण्याची तरतूद आहे. १० मार्च २०१६ रोजीच्या शासन आदेशात मुद्दा क्र. १.२ नुसार पुन्हा हीच तरतूद स्पष्ट केली. यापूर्वी जि.प. च्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचे मौखिक निर्देश दिले होते. शाळा व्यवस्थापन समित्यांनी तसे ठराव प्राथमिक शिक्षण विभागास पाठविले. जि.प. शाळांचे पाचवी व आठवीचे वर्ग सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे; पण शासनाचे आदेश स्पष्ट असताना जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने ३० एप्रिल रोजीच्या पत्रामुळे नाहक संभ्रम निर्माण झाला. पाचवी व आठवी वर्ग सुरू करणाऱ्या शाळांविरूद्ध पोलीस तक्रार दाखल केली जाईल, ही बाब निरर्थक आहे. यामुळे जि.प. शिक्षकांत भीती निर्माण झाली आहे. वास्तविक, जि.प. शाळांत शासन निर्णयातील तरतुदी पाहता वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आवश्यक सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा येत नसलेल्या सर्व जि.प. शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना विश्वासात घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत वर्ग सुरू करावे. यात जे घटक नियमबाह्य तक्रारी करतील, त्या तक्रारी शासन निर्णयातील स्पष्ट तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी निकाली काढून जि.प. शिक्षकांतील भीती दूर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)