शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

८६ दिवस लोटूनही अतिक्रमणावर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:36 IST

नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूने अवैधरीत्या उभारलेल्या हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण पाडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात या भागातील दोन नागरिकांनी प्रशासनाला नियम ८० व ३४ अन्वये नोटीस बजावली. या घटनेलाही ८६ दिवस लोटले. परंतु, कृपलानीच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नाही.

ठळक मुद्देराजकीय दबाव असल्याची शक्यता : कृपलानीचे अवैध हॉटेल बांधकाम प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूने अवैधरीत्या उभारलेल्या हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण पाडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात या भागातील दोन नागरिकांनी प्रशासनाला नियम ८० व ३४ अन्वये नोटीस बजावली. या घटनेलाही ८६ दिवस लोटले. परंतु, कृपलानीच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नाही. भाजपमधील राजकीय नेत्यांच्या दबावामुळे नगरपालिका व जिल्हा प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सुदामपुरीतील नागरिकांनी केला आहे. वुमेन्स एज्युकेशन सोसायटीद्वारा चालविल्या जाणाऱ्या केसरीमल कन्या शाळा व भरत ज्ञान मंदिरम्समोर १०० मीटरच्या आतच कृपलानीने शाळेची कोणतीही परवानगी न घेता हॉटेलचे बांधकाम केले आहे. कृपलानीने येथे यापूर्वी केलेल्या बांधकामालाही पालिकेची परवानगी नाही. त्यानंतर आता पहिल्या माळ्यावर उभारण्यात येत असलेल्या हॉटेल बांधकामालाही परवानगी देण्यात आली आलेली नाही. मुळातच ही जागा ज्यांच्याकडून कृपलानीने खरेदी केली आहे, त्या जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारावर एकाच क्रमांकाचे दोन व्यवहार झाले आहेत. हा खरेदी-विक्री व्यवहारही अडचणीत असताना कृपलानीने येथे हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे. कुठलाही एफएसआय, वाहनतळाची व्यवस्था इमारतीच्या सभोवताल नाही. सर्व वाहने रस्त्यावर उभी राहणार आहेत. अशा ठिकाणी महावितरणने अतिक्रमणातच विद्युत जनित्र लावून दिले आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कृपलानीला बजावलेल्या नोटिशीत बांधकाम अवैध असल्याचे नमूद केले आहे. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनीही या बांधकामाबाबत पालिकेला केलेल्या पत्रव्यवहारात हे बांधकाम अवैधच ठरविले आहे. असे असताना ८६ दिवस लोटूनही ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देणाऱ्या सरकारच्या यंत्रणेने कृपलानीवर कारवाई केली नाही.कृपलानीच्या लक्ष्मीदर्शनामुळे प्रशासन कारवाईत दिरंगाई करीत असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई न झाल्यास विद्यार्थी व पालक जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.