शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

८६ दिवस लोटूनही अतिक्रमणावर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:36 IST

नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूने अवैधरीत्या उभारलेल्या हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण पाडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात या भागातील दोन नागरिकांनी प्रशासनाला नियम ८० व ३४ अन्वये नोटीस बजावली. या घटनेलाही ८६ दिवस लोटले. परंतु, कृपलानीच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नाही.

ठळक मुद्देराजकीय दबाव असल्याची शक्यता : कृपलानीचे अवैध हॉटेल बांधकाम प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूने अवैधरीत्या उभारलेल्या हॉटेलच्या इमारतीचे अतिक्रमण पाडण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यासंदर्भात या भागातील दोन नागरिकांनी प्रशासनाला नियम ८० व ३४ अन्वये नोटीस बजावली. या घटनेलाही ८६ दिवस लोटले. परंतु, कृपलानीच्या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई झाली नाही. भाजपमधील राजकीय नेत्यांच्या दबावामुळे नगरपालिका व जिल्हा प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सुदामपुरीतील नागरिकांनी केला आहे. वुमेन्स एज्युकेशन सोसायटीद्वारा चालविल्या जाणाऱ्या केसरीमल कन्या शाळा व भरत ज्ञान मंदिरम्समोर १०० मीटरच्या आतच कृपलानीने शाळेची कोणतीही परवानगी न घेता हॉटेलचे बांधकाम केले आहे. कृपलानीने येथे यापूर्वी केलेल्या बांधकामालाही पालिकेची परवानगी नाही. त्यानंतर आता पहिल्या माळ्यावर उभारण्यात येत असलेल्या हॉटेल बांधकामालाही परवानगी देण्यात आली आलेली नाही. मुळातच ही जागा ज्यांच्याकडून कृपलानीने खरेदी केली आहे, त्या जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारावर एकाच क्रमांकाचे दोन व्यवहार झाले आहेत. हा खरेदी-विक्री व्यवहारही अडचणीत असताना कृपलानीने येथे हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे. कुठलाही एफएसआय, वाहनतळाची व्यवस्था इमारतीच्या सभोवताल नाही. सर्व वाहने रस्त्यावर उभी राहणार आहेत. अशा ठिकाणी महावितरणने अतिक्रमणातच विद्युत जनित्र लावून दिले आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कृपलानीला बजावलेल्या नोटिशीत बांधकाम अवैध असल्याचे नमूद केले आहे. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनीही या बांधकामाबाबत पालिकेला केलेल्या पत्रव्यवहारात हे बांधकाम अवैधच ठरविले आहे. असे असताना ८६ दिवस लोटूनही ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देणाऱ्या सरकारच्या यंत्रणेने कृपलानीवर कारवाई केली नाही.कृपलानीच्या लक्ष्मीदर्शनामुळे प्रशासन कारवाईत दिरंगाई करीत असल्याचा आरोप आता होत आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई न झाल्यास विद्यार्थी व पालक जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.