शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आभास परीक्षणातून ज्ञान विज्ञान होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:47 IST

जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : एक दिवसीय राज्यस्तरीय तंत्र परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) येथे राज्यस्तरीय एक दिवसीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला व्यासपीठावर राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. नारायण मूर्ती, अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य चंद्रकांत कोठारे, अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिषेककुमार सिंह, अग्निहोत्री पोलिटेक्निकचे प्रा. प्रमोद वाळके, प्रा. विजय वाढणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले, ज्ञान विज्ञानाची समीक्षा केली तर त्यातून दोन धारा उत्पन्न होतात. एक मनुष्य वर्धक शिक्षा आणि दुसरे तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) आहे. आरोग्य वर्धक मध्ये आपल्या जीवनावर होणारे परिणाम, प्रभाव यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान. मनुष्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, संशोधनासाठी, पाचही तत्त्वाच्या संशोधनासाठी यंत्रज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे. आपल्या अध्ययनातून आभास, अनुभूती, आकलन, कल्पना, परिकल्पना, दर्शन, परिणाम केला पाहिजे. याची संवेदना आपल्यात असली पाहिजे. हेच तत्त्व संशोधनासाठी उपयुक्त असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान प्राचार्य चंद्रकांत कोठारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य अभिषेककुमार सिंह यांनी केले तर संचालन प्रा. विजय वाढणकर यांनी केले. या राज्यस्तरीय टेक्नॉलॉजी परिषदेला नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा येथील विविध महाविद्यालाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.