शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

आभास परीक्षणातून ज्ञान विज्ञान होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:47 IST

जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री : एक दिवसीय राज्यस्तरीय तंत्र परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प्रतिपादन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्यस्तरीय तंत्र परिषदेत केले.अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नागठाणा रोड, सिंदी (मेघे) येथे राज्यस्तरीय एक दिवसीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाला व्यासपीठावर राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. नारायण मूर्ती, अग्निहोत्री स्कूल आॅफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य चंद्रकांत कोठारे, अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अभिषेककुमार सिंह, अग्निहोत्री पोलिटेक्निकचे प्रा. प्रमोद वाळके, प्रा. विजय वाढणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले, ज्ञान विज्ञानाची समीक्षा केली तर त्यातून दोन धारा उत्पन्न होतात. एक मनुष्य वर्धक शिक्षा आणि दुसरे तंत्रज्ञान (टेक्नोलॉजी) आहे. आरोग्य वर्धक मध्ये आपल्या जीवनावर होणारे परिणाम, प्रभाव यावर उपाय म्हणजे तंत्रज्ञान. मनुष्याच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, संशोधनासाठी, पाचही तत्त्वाच्या संशोधनासाठी यंत्रज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान सर्वव्यापी आहे. आपल्या अध्ययनातून आभास, अनुभूती, आकलन, कल्पना, परिकल्पना, दर्शन, परिणाम केला पाहिजे. याची संवेदना आपल्यात असली पाहिजे. हेच तत्त्व संशोधनासाठी उपयुक्त असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमादरम्यान प्राचार्य चंद्रकांत कोठारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य अभिषेककुमार सिंह यांनी केले तर संचालन प्रा. विजय वाढणकर यांनी केले. या राज्यस्तरीय टेक्नॉलॉजी परिषदेला नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा येथील विविध महाविद्यालाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.