शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:09 IST

उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.

ठळक मुद्देसहा ग्रा.पं. वर लक्ष : २६ हजार वैयक्तीक शौचालयाचे झाले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रबोधनही केले जात आहे. सध्या तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे.तालुक्यातील ४१ ग्रा.पं.पैकी ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर ६ ग्रा.पं.ची लोटामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्यास्थितीत एकूण २६ हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांना गावकºयांनी प्रतिसाद दिला आहे. शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी १२ हजार रूपयाचे अनुदान दिल्या जात आहे. यात खड्डा खोदकाम करून बांधकाम करण्यापर्यंत दोन टप्पे आहे. गत तीन वर्षापासून यासाठी सतत परिश्रम घेण्यात येत आहेत. उघड्यावर शौचास बसल्याने गावाचा दर्शनी भाग पूर्णपणे घाणेनी व्यापला जायचा. शिवाय नाकाला रूमाल लावून तितका मार्ग पार करावा लागत असे. उघड्यावर शौचास बसल्यास गावात रोगराईला आमंत्रण मिळत असल्याने शासनाने हागणदारीमुक्त गाव ही मोहीम प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले. तालुक्यात डोअर टू डोअर भेटी देवून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल मरबड व सर्व ग्रामसेवकांनी लोकांना शौचालयाचे महत्व पटवून दिले. त्यांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनाही हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पटल्याने गावकरी सुद्धा या उपक्रमात सक्रीय झाले. याचाच परिणाम म्हणजे तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. कुणी उसनवारीने तर कुणी दागीने गहाण ठेवून शौचालये बांधली. सध्या तालुक्यातील केवळ सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त होणे बाकी असून त्यासाठी प्रयत्न सूरू आहे.सभा घेऊन पटवून दिले शौचालयाचे महत्त्वस्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त गाव या उपक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.गावात उघड्यावर शौचास बसणाºयांना समज देण्यात आली. जनजागृती करून भेटी व सभा घेतल्या. त्यामुळे यश मिळाले आहे. सध्यास्थितीत ३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.- अनिल मरबडगटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).