शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात ३५ ग्रामपंचायती झाल्या हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:09 IST

उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे.

ठळक मुद्देसहा ग्रा.पं. वर लक्ष : २६ हजार वैयक्तीक शौचालयाचे झाले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : उघड्यावर प्रात:विधीकरिता बसल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. नागरिकांचे सुदृढ आरोग्य या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन शासनाच्यावतीने शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रबोधनही केले जात आहे. सध्या तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या असून उर्वरित सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे.तालुक्यातील ४१ ग्रा.पं.पैकी ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. तर ६ ग्रा.पं.ची लोटामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सध्यास्थितीत एकूण २६ हजार वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांना गावकºयांनी प्रतिसाद दिला आहे. शौचालय बांधकामासाठी प्रती लाभार्थी १२ हजार रूपयाचे अनुदान दिल्या जात आहे. यात खड्डा खोदकाम करून बांधकाम करण्यापर्यंत दोन टप्पे आहे. गत तीन वर्षापासून यासाठी सतत परिश्रम घेण्यात येत आहेत. उघड्यावर शौचास बसल्याने गावाचा दर्शनी भाग पूर्णपणे घाणेनी व्यापला जायचा. शिवाय नाकाला रूमाल लावून तितका मार्ग पार करावा लागत असे. उघड्यावर शौचास बसल्यास गावात रोगराईला आमंत्रण मिळत असल्याने शासनाने हागणदारीमुक्त गाव ही मोहीम प्राधान्याने राबविण्याचे निश्चित केले. तालुक्यात डोअर टू डोअर भेटी देवून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल मरबड व सर्व ग्रामसेवकांनी लोकांना शौचालयाचे महत्व पटवून दिले. त्यांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनाही हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना पटल्याने गावकरी सुद्धा या उपक्रमात सक्रीय झाले. याचाच परिणाम म्हणजे तालुक्यातील ३५ ग्रा.पं. हागणदारीमुक्त झाल्या आहेत. कुणी उसनवारीने तर कुणी दागीने गहाण ठेवून शौचालये बांधली. सध्या तालुक्यातील केवळ सहा ग्रा.पं. हागणदारीमुक्त होणे बाकी असून त्यासाठी प्रयत्न सूरू आहे.सभा घेऊन पटवून दिले शौचालयाचे महत्त्वस्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त गाव या उपक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी गावागावात सभा घेऊन शौचालयाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले.गावात उघड्यावर शौचास बसणाºयांना समज देण्यात आली. जनजागृती करून भेटी व सभा घेतल्या. त्यामुळे यश मिळाले आहे. सध्यास्थितीत ३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.- अनिल मरबडगटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).