शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

वर्धेत तब्बल २.२४ लाख दुचाकींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:52 IST

महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देवाहनांची एकूण संख्या ३ लाखांच्या घरात : नियमांची मात्र नेहमीच पायमल्ली

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात वेगळीच ओळख द्यावी लागेल, अशी स्थिती वाहनांच्या संख्येने केली आहे. वर्धा शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २ लाख ७० हजार ७७४ वर पोहोचली आहे. यात दुचाकींची संख्या तब्बल २ लाख २४ हजार ५८३ इतकी आहे. विशेष म्हणजे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या वर्षभरात वाहन संख्येमध्ये तब्बल २५ हजार ६३९ वाहनांची भर पडली आहे.प्रादेशिक परिवहन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली. मागील वर्षभरात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ यात दुचाकीच्या संख्येत २१ हजार ४७३ ने वाढ झाली आहे. चार चाकी वाहनांची संख्या १७ हजार ६२५ च्या वर पोहोचली असून त्यात या वर्षात २० हजार ४४ वाहनांची भर पडली. कॅब, रिक्षा, ट्रक, लॉरी आणि डिलीव्हरी व्हॅनच्या संख्येत वाढ झाली आहे. स्कुल बस, रुग्णवाहिका, खासगी बस, ट्रक, ट्रॅक्टर, मालवाहू वाहनांची विक्री मागील वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. शहरात आॅटो रिक्षांची संख्या ५ हजार ३५ असून १७० ने भर पडली आहे. मिनीबस, स्कूल बस, रुग्णवाहिका, ट्रक, ट्रॅक्टर, डिलेव्हरी व्हॅन, ट्रेलर आणि इतर वाहनांची संख्या २३ हजार १६३ आहे. यात यावर्षी १ हजार ९४६ वाहनांची भर पडली आहे.वाहनांची नोंदणीपूर्वी वाहनांची संख्या २ लाख ४५ हजार १३५ होती यात दुचाकी २ लाख ६ हजार ११०, चारचाकी १५ हजार ५८९, इतर वाहने २६ हजार ४४४, या वर्षात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८, वाहनांची संख्या २५ हजार ६३९ यात दुचाकी २१ हजार ४७३, चारचाकी २ हजार ४४, इतर वाहने २ हजार ११६.नियमांबाबत उदासीनताचशहरात वाहनांची संख्या कमालिची वाढत असली तरी वाहतूक नियमाच्या अंमलाकरिता चालकांत मात्र कमालीची उदासिलता आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे.