शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शनगरात पाण्यासाठी संताप

By admin | Updated: April 12, 2017 00:17 IST

येथील आदर्शनगर परिसरात दर उन्हाळ्याला पाणी टंचाई डोके वर काढते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

ग्रामपंचायतीकडे थकले होते जीवन प्राधिकरणचे देयक सेवाग्राम : येथील आदर्शनगर परिसरात दर उन्हाळ्याला पाणी टंचाई डोके वर काढते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. असे असताना यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात आली नाही. यामुळे येथील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सध्या येथील नागरिकांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळत आहे. आदर्शनगर प्रभाग तीन वसाहती आहेत. शिवाय ग्रामपंचायतीची स्वतंत्र्य पाणी पुरवठा विहीर आहे. येथे चारशेच्या जवळपास घरे असून या भागाचा ले-आऊटमुळे विस्तार होत आहे. दोन हातपंप असतानाही दरवर्षी उन्हाळ्यात पाणी समस्यसा तीव्ररूप धारण करते. ग्रा.पं.ची तारांबळ उडून धावाधाव सुरू होते. असा दरवर्षीचा शिरस्ता पडला. यामुळे पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजन आखण्याची मागणी आहे. नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रा.पं.च्या मागणीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुरवठा केला. मे, जून, जुलै २०१६ या तीन महिन्यांचे देयक ७५ हजार झाले. ते भरण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनाची असूनही त्यांनी देयक अदा केले नाही. अखेर वेळेवर सरपंच रोशना जामलेकर व सचिव अजय येवले यांनी कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ यांची भेट घेतली. पैसे भरण्याचे आश्वासन दिले. ग्रा.पं. प्रशासनाचा जीवन प्राधिकरणाला वाईट अनुभव देयकाबाबत असल्याने पहिले थकित बिल भरा नंतरच पाणी, अशी भूमिका घेतल्याने ग्रामविकास अधिकारी येवले यांनी ४० हजारांचा धनादेश देवून मार्ग काढला.(वार्ताहर)आदर्श नगरसाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी विहीर व जलकुंभ आहे. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटत असल्याने रोजच पाण्याचा प्रश्न उद्भवतो. चार वर्षांपूर्वी ग्रा.पं. प्रशासनाने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाईपलाईन आदर्शनगरच्या विहिरीत टाकली. पण मूळ गावतच पाणी कमी असल्याने पाईला लाईनचा खर्च व्यर्थ ठरला. ऐवढेच नाही तर २०१६ मध्ये विहिरीत बोर केले; पण पुरेसे पाणी लागले नसल्याने जीवन प्राधिकरणाशिवाय पर्याय नाही.सरपंच, सचिवाशी चर्चा झाली. धनादेश जमा करण्यात आला आहे. जुलै २०१६ नंतर पासून कनेक्शन बंद असल्याने लवकरच तपासणी करून आदर्श नगर वासियांना पाणी मिळेल. ग्रा.पं.ने आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवल्यास पाणी द्यायला हरकत नाही.- अभियंता चवडे, अभियंता, जीवन प्राधिकरण