शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

आदर्शनगरात पाण्यासाठी संताप

By admin | Updated: April 12, 2017 00:17 IST

येथील आदर्शनगर परिसरात दर उन्हाळ्याला पाणी टंचाई डोके वर काढते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

ग्रामपंचायतीकडे थकले होते जीवन प्राधिकरणचे देयक सेवाग्राम : येथील आदर्शनगर परिसरात दर उन्हाळ्याला पाणी टंचाई डोके वर काढते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. असे असताना यावर अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना आखण्यात आली नाही. यामुळे येथील नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सध्या येथील नागरिकांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळत आहे. आदर्शनगर प्रभाग तीन वसाहती आहेत. शिवाय ग्रामपंचायतीची स्वतंत्र्य पाणी पुरवठा विहीर आहे. येथे चारशेच्या जवळपास घरे असून या भागाचा ले-आऊटमुळे विस्तार होत आहे. दोन हातपंप असतानाही दरवर्षी उन्हाळ्यात पाणी समस्यसा तीव्ररूप धारण करते. ग्रा.पं.ची तारांबळ उडून धावाधाव सुरू होते. असा दरवर्षीचा शिरस्ता पडला. यामुळे पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजन आखण्याची मागणी आहे. नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रा.पं.च्या मागणीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुरवठा केला. मे, जून, जुलै २०१६ या तीन महिन्यांचे देयक ७५ हजार झाले. ते भरण्याची जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनाची असूनही त्यांनी देयक अदा केले नाही. अखेर वेळेवर सरपंच रोशना जामलेकर व सचिव अजय येवले यांनी कार्यकारी अभियंता डी.एस. वाघ यांची भेट घेतली. पैसे भरण्याचे आश्वासन दिले. ग्रा.पं. प्रशासनाचा जीवन प्राधिकरणाला वाईट अनुभव देयकाबाबत असल्याने पहिले थकित बिल भरा नंतरच पाणी, अशी भूमिका घेतल्याने ग्रामविकास अधिकारी येवले यांनी ४० हजारांचा धनादेश देवून मार्ग काढला.(वार्ताहर)आदर्श नगरसाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी विहीर व जलकुंभ आहे. उन्हाळ्यात विहिरीचे पाणी आटत असल्याने रोजच पाण्याचा प्रश्न उद्भवतो. चार वर्षांपूर्वी ग्रा.पं. प्रशासनाने जुन्या वस्तीतील विहिरीवरून पाईपलाईन आदर्शनगरच्या विहिरीत टाकली. पण मूळ गावतच पाणी कमी असल्याने पाईला लाईनचा खर्च व्यर्थ ठरला. ऐवढेच नाही तर २०१६ मध्ये विहिरीत बोर केले; पण पुरेसे पाणी लागले नसल्याने जीवन प्राधिकरणाशिवाय पर्याय नाही.सरपंच, सचिवाशी चर्चा झाली. धनादेश जमा करण्यात आला आहे. जुलै २०१६ नंतर पासून कनेक्शन बंद असल्याने लवकरच तपासणी करून आदर्श नगर वासियांना पाणी मिळेल. ग्रा.पं.ने आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवल्यास पाणी द्यायला हरकत नाही.- अभियंता चवडे, अभियंता, जीवन प्राधिकरण