शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

रोजगार हमी योजनेच्या कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:14 IST

३ वर्षांपासून देयके थकली : लाभार्थ्यांनी कर्ज काढून केली कामे, मजुरांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.): खेड्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी १०० दिवसांची रोजगार हमी योजना तयार करण्यात आली. या माध्यमातून वृक्षारोपण, घरकूल बांधकाम, फळ लागवड आदी कामे केली जातात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील अनेक मजुरांना ५ महिन्यांपासून तर रोजगार सेवकांना ६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. वायगाव निपाणी येथे ३०-३५ मजुरांमध्ये 3 दाम्पत्य या कामावर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

केंद्र व राज्य सरकार मिळून देशात रोजगार हमी योजना अभियान राबवण्यात येते. वायगाव नजीकच्या संपूर्ण परिसरात रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षारोपणाचे काम ३० ते ३५ मजुरांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना आठवड्याला २०९७ रुपये मजुरीही दिली जाते. कामाचे जॉबकार्ड तयार करण्यात आले. सुरुवातीला पैसे थेट खात्यात जमा होत होते. मात्र, ५ महिन्यांपासून कोणत्याही मजुराचे पैसे जमा झाले नसल्याची माहिती मजुरांनी दिली. 

मजुरांवर उपासमारीची वेळगत ५ महिन्यांपासून मजुरी मिळाली नसल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. मजुरांकडून काम करून घेणारे रोजगार सेवक विनोद नगराळे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, आमचीही परिस्थिती तशीच आहे. आमचेही मानधन ६ महिन्यांपासून मिळाले नाही. मजुरीसाठी मजूर त्रास देतात दुसरीकडे आमचेही वेतन आले नसल्याने आम्ही आंदोलनाच्या तयारीत असल्याचे नगराळे यांनी सांगितले.

३ वर्षांपासून अनेकांची देयके थकली३ वर्षापासून सार्वजनिक फंड कुशल बिल मिळाले नाहीत. वैयक्तिक कुशल बिलाचा जीआर ३ महिन्यांपर्यंत फंड उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तरीही वर्ष उलटून गेला तरी कुशलचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. लाभार्थ्यांनी कर्ज काढून विहीर बांधकाम केले, पण पैसे न आल्याने लाभार्थी खूप विवंचनेत आहेत. 

"गेल्या ५ महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नाही. याच कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. या नाही तर पुढल्या आठवड्याला पैसे मिळणार या आशेवर उधारवाडी करून घर चालविणे सुरु आहे. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आद्याप मिळाला नाही. यामुळे आता काय करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे."-साधना वानखेडे, रोजगार हमी योजना मजूर

"१०० दिवसांपयर्तची मजुरी केंद्र सरकारकडून दिली जाते. त्याव्यतिरिक्त वरील मजुरी राज्य शासन देते. मजुरांच्या कामाचे मस्टर ७ दिवसांनंतर अपलोड होतात. जिल्ह्यात काही भागांतील मजुरांना पैसे मिळाले आहेत, काहींना लवकरच मिळतील. ही प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने होत आहे."

- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी

"ग्रामरोजगार सहाय्यक यांचा ३ ऑक्टोबर २०२४ जीआर काढला, परंतु ६ महिने झाले तरी अमलात आणला नाही. जुन्या पद्धतीने ८ मार्च २०२१ च्या जीआरप्रमाणे ५ महिन्याचे मानधन काढण्यात आले होते. आता गेल्या ६ महिन्यांपासून आमचे मानधन झाले नाही. वरिष्ठांना विचारणा केली तर शासनाकडे पैसा नाही, असे बोलतात. यामुळे अनेक मजुरांचे पैसे थकले आहे."- विनोद नगराळे, रोजगार सेवक 

टॅग्स :wardha-acवर्धा