शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेच्या कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:14 IST

३ वर्षांपासून देयके थकली : लाभार्थ्यांनी कर्ज काढून केली कामे, मजुरांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.): खेड्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी १०० दिवसांची रोजगार हमी योजना तयार करण्यात आली. या माध्यमातून वृक्षारोपण, घरकूल बांधकाम, फळ लागवड आदी कामे केली जातात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील अनेक मजुरांना ५ महिन्यांपासून तर रोजगार सेवकांना ६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. वायगाव निपाणी येथे ३०-३५ मजुरांमध्ये 3 दाम्पत्य या कामावर असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

केंद्र व राज्य सरकार मिळून देशात रोजगार हमी योजना अभियान राबवण्यात येते. वायगाव नजीकच्या संपूर्ण परिसरात रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षारोपणाचे काम ३० ते ३५ मजुरांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना आठवड्याला २०९७ रुपये मजुरीही दिली जाते. कामाचे जॉबकार्ड तयार करण्यात आले. सुरुवातीला पैसे थेट खात्यात जमा होत होते. मात्र, ५ महिन्यांपासून कोणत्याही मजुराचे पैसे जमा झाले नसल्याची माहिती मजुरांनी दिली. 

मजुरांवर उपासमारीची वेळगत ५ महिन्यांपासून मजुरी मिळाली नसल्याने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. मजुरांकडून काम करून घेणारे रोजगार सेवक विनोद नगराळे यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, आमचीही परिस्थिती तशीच आहे. आमचेही मानधन ६ महिन्यांपासून मिळाले नाही. मजुरीसाठी मजूर त्रास देतात दुसरीकडे आमचेही वेतन आले नसल्याने आम्ही आंदोलनाच्या तयारीत असल्याचे नगराळे यांनी सांगितले.

३ वर्षांपासून अनेकांची देयके थकली३ वर्षापासून सार्वजनिक फंड कुशल बिल मिळाले नाहीत. वैयक्तिक कुशल बिलाचा जीआर ३ महिन्यांपर्यंत फंड उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. तरीही वर्ष उलटून गेला तरी कुशलचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. लाभार्थ्यांनी कर्ज काढून विहीर बांधकाम केले, पण पैसे न आल्याने लाभार्थी खूप विवंचनेत आहेत. 

"गेल्या ५ महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नाही. याच कामाच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. या नाही तर पुढल्या आठवड्याला पैसे मिळणार या आशेवर उधारवाडी करून घर चालविणे सुरु आहे. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आद्याप मिळाला नाही. यामुळे आता काय करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे."-साधना वानखेडे, रोजगार हमी योजना मजूर

"१०० दिवसांपयर्तची मजुरी केंद्र सरकारकडून दिली जाते. त्याव्यतिरिक्त वरील मजुरी राज्य शासन देते. मजुरांच्या कामाचे मस्टर ७ दिवसांनंतर अपलोड होतात. जिल्ह्यात काही भागांतील मजुरांना पैसे मिळाले आहेत, काहींना लवकरच मिळतील. ही प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने होत आहे."

- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी

"ग्रामरोजगार सहाय्यक यांचा ३ ऑक्टोबर २०२४ जीआर काढला, परंतु ६ महिने झाले तरी अमलात आणला नाही. जुन्या पद्धतीने ८ मार्च २०२१ च्या जीआरप्रमाणे ५ महिन्याचे मानधन काढण्यात आले होते. आता गेल्या ६ महिन्यांपासून आमचे मानधन झाले नाही. वरिष्ठांना विचारणा केली तर शासनाकडे पैसा नाही, असे बोलतात. यामुळे अनेक मजुरांचे पैसे थकले आहे."- विनोद नगराळे, रोजगार सेवक 

टॅग्स :wardha-acवर्धा