शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिरीमिरीच्या व्यवहारासाठी घरकुल लाभार्थ्यांचे पैसे अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 22:35 IST

तालुक्यातील शेंदरी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी ग्रामसेवक, अन्य अधिकारी यांच्या मागणीनुसार चिरीमिरीचा व्यवहार केला नाही म्हणून त्यांचा धनादेश अडवून धरण्यात आला. घरकुलाचे बांधकाम स्लॅबपर्यंत करूनसुद्धा या गरीब लाभार्थ्याला एकही पैसा न देता ग्रामसेवक व पं. स. विस्तार अधिकारी  यांच्याकडून  मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच अशिक्षित  वृद्ध असलेल्या लाभार्थ्यांना  शिवीगाळ करून अपमानित केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील शेंदरी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी ग्रामसेवक, अन्य अधिकारी यांच्या मागणीनुसार चिरीमिरीचा व्यवहार केला नाही म्हणून त्यांचा धनादेश अडवून धरण्यात आला. घरकुलाचे बांधकाम स्लॅबपर्यंत करूनसुद्धा या गरीब लाभार्थ्याला एकही पैसा न देता ग्रामसेवक व पं. स. विस्तार अधिकारी  यांच्याकडून  मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच अशिक्षित  वृद्ध असलेल्या लाभार्थ्यांना  शिवीगाळ करून अपमानित केले जात आहे. बांधकामाचा एक कॉलम बाहेर आल्याचे खोटे प्रकरण रंगवून तसेच याबाबतची तक्रार कुठेही केल्यास घरकुल रद्द करण्याची धमकी दिली जात आहे, अशी लेखी तक्रार घरकुल लाभार्थी सुलोचना ज्ञानेश्वर बहादुरे यांच्या वतीने त्यांची मुलगी उज्ज्वला बहादुरे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा तसेच पं. स. गट विकास अधिकारी युवराज जंगले यांच्याकडे केली आहे.  तालुक्यातील शेंदरी येथे मागील २० वर्षांपासून बहादुरे कुटुंबीय राहत असून, हातमजुरी करून जीवन व्यतीत करीत आहे. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या बाहेरगावी असलेल्या मुली  लक्ष ठेवून आहेत. बहादुरे यांचे जुने राहते घर पडल्याने हे संपूर्ण कुटुंबीय गेल्या वर्षभरापासून गावातील समाज मंदिरात आश्रयास आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत त्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले. त्यानुसार जुन्या राहत्या घराचे ६६० चौ. फूट जागेवर ग्रामसेवक जाधव व सरपंच यांनी घरकुलाचे लेआऊट टाकून दिले. त्याप्रमाणे घरकुलाच्या बांधकामाला सुरुवात करून स्लॅबपर्यंत सदर बांधकाम करण्यात आले. परंतु यादरम्यान ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राशिवाय घरकुलच्या बांधकामाचे पैसे मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पाहता घरकुलची ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असताना तसेच जीपीएस मॅपिंगच्या माध्यमातून फोटो घेण्यात आला असताना ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राची गरज काय? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे या योजनेसाठी राबणारी संपूर्ण यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याच कारणाने गेल्या सहा महिन्यांपासून  घरकुल लाभार्थ्याला त्रास दिला जात आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार किळसवाणा तसेच गरीब लाभार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याची  भावना व्यक्त होत आहे. चौकशीची मागणी जोर धरीत आहे.

तक्रार होताच लाभार्थ्याला दिले पत्र

- ग्रामसेवक  व पं. स. विस्तार अधिकारी  कारणीभूत असल्याने  याबाबतची तक्रार बुधवार रोजी बीडीओ जंगले व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची मागणी लावून धरण्यात आली. त्यामुळे सदर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून ग्रामसेवक जाधव यांनी बांधकामाचा एक कॉलम बाहेर असल्याचे पत्र मागील २ ऑगस्टची तारीख टाकून गुरुवार रोजी बहादुरे यांच्या हातात थोपविले. सदर पत्र गावातील काहींच्या समक्ष ग्रामपंचायत चपराशी यांनी अशिक्षित लाभार्थ्यांच्या हातात आणून दिले. 

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना