शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल

By admin | Updated: May 23, 2015 02:20 IST

नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला.

वर्धा : नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला. यामध्ये पाच वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काहींना त्यांची अडचण लक्षात घेऊन आहे तिथेच एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१ बदल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या झाल्या आहेत. यात १७८ पोलीस नाईक, आठ चालक पोलीस नाईक आणि २३ महिला पोलीस नाईकचा समावेश आहे. यातील २१ जणांना आहे तिथेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७१ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १५१ पोलीस हवालदार, ११ चालक व ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. यामध्ये १३ जणांना आहे त्याच ठाण्यात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.पोलीस शिपाई पदाच्या ६३ बदल्यांमध्ये ३२ पोलीस शिपाई, तीन चालक पोलीस शिफाई व २८ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. सहायक फौजदार पदाच्या एकूण ८६ बदल्या करण्यात आल्या. यात सात जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना एक वर्षाची त्याच ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ७० सहायक फौजदार, १३ चालक सहायक फौजदार आणि ३ महिला सहायक फौजदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच पोलीस महासंचालकांचे पत्राच्या आधारे आस्थापना मंडळाने छाननी अंती या बदल्या करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी) ंबदली आदेशावरुन असाही सूरबदली आदेशावर प्रभारी पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. तसेच हे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. वास्तविक, २१ मे रोजी अंकित गोयल यांनी पारस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. एक दिवस उशिराने बदल्यांचा आदेश काढला असता तर त्यावर नव्या पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असती, मग एक दिवसासाठी घाई का, असा सूर पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून काढला जात आहे.काहींना पारदर्शकता पाळल्याचा आनंदबदल्यांमध्ये काहींना मनाप्रमाणे ठाणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे, तर काहींना हवे असलेले ठाणे मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बदल्यावरुन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बदल्या पारदर्शक झाल्या असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीही विचारात घेतल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.