शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल

By admin | Updated: May 23, 2015 02:20 IST

नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला.

वर्धा : नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला. यामध्ये पाच वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काहींना त्यांची अडचण लक्षात घेऊन आहे तिथेच एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१ बदल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या झाल्या आहेत. यात १७८ पोलीस नाईक, आठ चालक पोलीस नाईक आणि २३ महिला पोलीस नाईकचा समावेश आहे. यातील २१ जणांना आहे तिथेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७१ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १५१ पोलीस हवालदार, ११ चालक व ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. यामध्ये १३ जणांना आहे त्याच ठाण्यात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.पोलीस शिपाई पदाच्या ६३ बदल्यांमध्ये ३२ पोलीस शिपाई, तीन चालक पोलीस शिफाई व २८ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. सहायक फौजदार पदाच्या एकूण ८६ बदल्या करण्यात आल्या. यात सात जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना एक वर्षाची त्याच ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ७० सहायक फौजदार, १३ चालक सहायक फौजदार आणि ३ महिला सहायक फौजदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच पोलीस महासंचालकांचे पत्राच्या आधारे आस्थापना मंडळाने छाननी अंती या बदल्या करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी) ंबदली आदेशावरुन असाही सूरबदली आदेशावर प्रभारी पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. तसेच हे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. वास्तविक, २१ मे रोजी अंकित गोयल यांनी पारस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. एक दिवस उशिराने बदल्यांचा आदेश काढला असता तर त्यावर नव्या पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असती, मग एक दिवसासाठी घाई का, असा सूर पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून काढला जात आहे.काहींना पारदर्शकता पाळल्याचा आनंदबदल्यांमध्ये काहींना मनाप्रमाणे ठाणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे, तर काहींना हवे असलेले ठाणे मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बदल्यावरुन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बदल्या पारदर्शक झाल्या असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीही विचारात घेतल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.