शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांचे ठाणे बदल

By admin | Updated: May 23, 2015 02:20 IST

नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला.

वर्धा : नवे पोलीस अधीक्षक रुजू होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ५२१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचा पोळा फुटला. यामध्ये पाच वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जिल्ह्यातील १६ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. काहींना त्यांची अडचण लक्षात घेऊन आहे तिथेच एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक २०१ बदल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचाऱ्याच्या झाल्या आहेत. यात १७८ पोलीस नाईक, आठ चालक पोलीस नाईक आणि २३ महिला पोलीस नाईकचा समावेश आहे. यातील २१ जणांना आहे तिथेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. १७१ पोलीस हवालदार पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल १५१ पोलीस हवालदार, ११ चालक व ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहेत. यामध्ये १३ जणांना आहे त्याच ठाण्यात एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.पोलीस शिपाई पदाच्या ६३ बदल्यांमध्ये ३२ पोलीस शिपाई, तीन चालक पोलीस शिफाई व २८ महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. सहायक फौजदार पदाच्या एकूण ८६ बदल्या करण्यात आल्या. यात सात जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये १० जणांना एक वर्षाची त्याच ठाण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये ७० सहायक फौजदार, १३ चालक सहायक फौजदार आणि ३ महिला सहायक फौजदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच पोलीस महासंचालकांचे पत्राच्या आधारे आस्थापना मंडळाने छाननी अंती या बदल्या करण्यात आल्या आहेत.(जिल्हा प्रतिनिधी) ंबदली आदेशावरुन असाही सूरबदली आदेशावर प्रभारी पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी आहे. तसेच हे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. वास्तविक, २१ मे रोजी अंकित गोयल यांनी पारस्कर यांच्याकडून पदभार स्वीकारला. एक दिवस उशिराने बदल्यांचा आदेश काढला असता तर त्यावर नव्या पोलीस अधीक्षकांची स्वाक्षरी असती, मग एक दिवसासाठी घाई का, असा सूर पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून काढला जात आहे.काहींना पारदर्शकता पाळल्याचा आनंदबदल्यांमध्ये काहींना मनाप्रमाणे ठाणी मिळाली नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे, तर काहींना हवे असलेले ठाणे मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. बदल्यावरुन काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर बदल्या पारदर्शक झाल्या असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीही विचारात घेतल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.