शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:21 IST

घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : पोलीस विभागही गंभीर नाही, कायदा अस्तित्वात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.बापूंचे सेवाग्रामातील वास्तव्य, स्वातंत्र्य संग्रामाची त्यांनी आश्रमातून हलविलेली सूत्रे, पवनार येथील आचार्य विनोबा भावेंचा आश्रम, पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडार यामुळे वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. याशिवाय देशातील सर्वांत लहान सहाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळेच वर्षाकाठी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालये, केंद्राच्या अखत्यारितील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय  हिंदी विश्वविद्यालय आदी असल्याने शिक्षणाचेही वर्धा हब आहे. यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्य आणि देशातील कुटुंबे वर्ध्यात स्थायी-अस्थायी स्वरूपात वास्तव्याला आहेत. वर्ध्यात कुणाकडे अस्थायी स्वरूपात राहायला व्यक्ती, कुटुंबाने संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. कुणाविषयी संशय असल्यास पोलिसांकडून त्याची खातरजमा केली जाते. मात्र, या नियमाविषयी पोलीस विभाग अर्थात गृह विभागाकडूनही आजवर प्रभावी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ध्यासारख्या जगात ख्याती असलेल्या जिल्ह्यात कुणीही येतो अन् कुणीही येतो, असाच अजब प्रकार सुरू आहे. यामुळे गांधी जिल्ह्याच्या सुरक्षेविषयीच प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यातील साईनगर, स्वागत कॉलनी, स्रेहलनगर, धन्वंतरीनगर, गजानननगर, गोंड प्लॉट, आलोडी, नालवाडी व अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. मागील महिन्यातच इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्याच्या कुटुंबातील महिलेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चमूने ताब्यात घेतले. ही महिलादेखील म्हसाळ्यातील एका निवासस्थानी भाडेकरू म्हणून वास्तव्याला होती. वर्ध्यासारख्या महत्त्वाच्या शहरात घातपात घडविण्याचे या संघटनेचे मनसुबे होते की काय, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.घरमालकाने भाडेकरूची नोंद करावी हा नियम केवळ बड्या शहरांनाच नव्हे, तर छोट्या शहरांनाही लागू आहे. घरमालकांनी भाडेकरूची नोंद करायलाच हवी. नोंदणी नंतर काही विभागाला काही आढळून आल्यास व्हेरिफिकेशन केले जाते. शहरातील घरमालकांनी भाडेकरूची नोंद करून पोलीस विभागाला सहकार्य करावे.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Policeपोलिस