शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:21 IST

घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : पोलीस विभागही गंभीर नाही, कायदा अस्तित्वात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.बापूंचे सेवाग्रामातील वास्तव्य, स्वातंत्र्य संग्रामाची त्यांनी आश्रमातून हलविलेली सूत्रे, पवनार येथील आचार्य विनोबा भावेंचा आश्रम, पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडार यामुळे वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. याशिवाय देशातील सर्वांत लहान सहाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळेच वर्षाकाठी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालये, केंद्राच्या अखत्यारितील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय  हिंदी विश्वविद्यालय आदी असल्याने शिक्षणाचेही वर्धा हब आहे. यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्य आणि देशातील कुटुंबे वर्ध्यात स्थायी-अस्थायी स्वरूपात वास्तव्याला आहेत. वर्ध्यात कुणाकडे अस्थायी स्वरूपात राहायला व्यक्ती, कुटुंबाने संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. कुणाविषयी संशय असल्यास पोलिसांकडून त्याची खातरजमा केली जाते. मात्र, या नियमाविषयी पोलीस विभाग अर्थात गृह विभागाकडूनही आजवर प्रभावी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ध्यासारख्या जगात ख्याती असलेल्या जिल्ह्यात कुणीही येतो अन् कुणीही येतो, असाच अजब प्रकार सुरू आहे. यामुळे गांधी जिल्ह्याच्या सुरक्षेविषयीच प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यातील साईनगर, स्वागत कॉलनी, स्रेहलनगर, धन्वंतरीनगर, गजानननगर, गोंड प्लॉट, आलोडी, नालवाडी व अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. मागील महिन्यातच इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्याच्या कुटुंबातील महिलेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चमूने ताब्यात घेतले. ही महिलादेखील म्हसाळ्यातील एका निवासस्थानी भाडेकरू म्हणून वास्तव्याला होती. वर्ध्यासारख्या महत्त्वाच्या शहरात घातपात घडविण्याचे या संघटनेचे मनसुबे होते की काय, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.घरमालकाने भाडेकरूची नोंद करावी हा नियम केवळ बड्या शहरांनाच नव्हे, तर छोट्या शहरांनाही लागू आहे. घरमालकांनी भाडेकरूची नोंद करायलाच हवी. नोंदणी नंतर काही विभागाला काही आढळून आल्यास व्हेरिफिकेशन केले जाते. शहरातील घरमालकांनी भाडेकरूची नोंद करून पोलीस विभागाला सहकार्य करावे.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Policeपोलिस