शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
3
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
4
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
5
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
6
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
7
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
8
गोव्याला विसरून जाल! भारतातील पाच जबरदस्त बीच, एक आहे कोकणातील, तुमची सुट्टी दुप्पट आनंददायी होईल
9
१३ दागिन्यांची दुकाने, ६ रेस्टॉरंट्स आणि ४ सुपरमार्केटचा मालक, तरीही दररोज चालवतात टॅक्सी; का?
10
T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटूंचा भरणा! ३ अनफिट खेळाडूंचीही वर्ल्ड कपसाठी निवड
11
उत्तर-दक्षिण ते पूर्व-पश्चिम; 2026 मध्ये देशाला मिळणार चारही दिशा जोडणारे 8 नवे एक्सप्रेसवे
12
"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
ना निष्ठा, ना विचारधारा ८ दिवसांत ३ पक्ष बदलले; कुख्यात गुंडाला ठाण्यात कुणी दिली उमेदवारी?
14
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
15
पदाचा गैरवापर केल्याचा ठाकरे गटाचा आरोप; राहुल नार्वेकर उत्तर देत म्हणाले, “संजय राऊत...”
16
नव्या वर्षात मुंबई, कोकण, पुण्यात म्हाडाची लॉटरी; आचारसंहिता संपताच प्रक्रियेला वेग 
17
किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
18
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
19
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
20
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंची नोंद पोलीस ठाण्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:21 IST

घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजनजागृतीचा अभाव : पोलीस विभागही गंभीर नाही, कायदा अस्तित्वात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरमालकाने भाडे तत्त्वावर राहायला आलेल्या व्यक्ती, कुटुंबाची पोलीस ठाण्यात नोंद करावी, असा कायदा आहे. मात्र, याविषयी पोलीस विभागाकडून प्रभावी जनजागृतीच होत नसल्याने कायदा पायदळी तुडविला जात असल्याचे चित्र आहे.बापूंचे सेवाग्रामातील वास्तव्य, स्वातंत्र्य संग्रामाची त्यांनी आश्रमातून हलविलेली सूत्रे, पवनार येथील आचार्य विनोबा भावेंचा आश्रम, पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडार यामुळे वर्धा जिल्ह्याचा संपूर्ण जगभरात नावलौकिक आहे. याशिवाय देशातील सर्वांत लहान सहाव्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळेच वर्षाकाठी येथे लाखो देशी-विदेशी पर्यटक सातत्याने येत असतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालये, केंद्राच्या अखत्यारितील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय  हिंदी विश्वविद्यालय आदी असल्याने शिक्षणाचेही वर्धा हब आहे. यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर इतर राज्य आणि देशातील कुटुंबे वर्ध्यात स्थायी-अस्थायी स्वरूपात वास्तव्याला आहेत. वर्ध्यात कुणाकडे अस्थायी स्वरूपात राहायला व्यक्ती, कुटुंबाने संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करणे गरजेचे आहे. कुणाविषयी संशय असल्यास पोलिसांकडून त्याची खातरजमा केली जाते. मात्र, या नियमाविषयी पोलीस विभाग अर्थात गृह विभागाकडूनही आजवर प्रभावी जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्ध्यासारख्या जगात ख्याती असलेल्या जिल्ह्यात कुणीही येतो अन् कुणीही येतो, असाच अजब प्रकार सुरू आहे. यामुळे गांधी जिल्ह्याच्या सुरक्षेविषयीच प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यातील साईनगर, स्वागत कॉलनी, स्रेहलनगर, धन्वंतरीनगर, गजानननगर, गोंड प्लॉट, आलोडी, नालवाडी व अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर भाडेकरू आहेत. मागील महिन्यातच इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्याच्या कुटुंबातील महिलेला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चमूने ताब्यात घेतले. ही महिलादेखील म्हसाळ्यातील एका निवासस्थानी भाडेकरू म्हणून वास्तव्याला होती. वर्ध्यासारख्या महत्त्वाच्या शहरात घातपात घडविण्याचे या संघटनेचे मनसुबे होते की काय, हे मात्र स्पष्ट झाले नाही. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.घरमालकाने भाडेकरूची नोंद करावी हा नियम केवळ बड्या शहरांनाच नव्हे, तर छोट्या शहरांनाही लागू आहे. घरमालकांनी भाडेकरूची नोंद करायलाच हवी. नोंदणी नंतर काही विभागाला काही आढळून आल्यास व्हेरिफिकेशन केले जाते. शहरातील घरमालकांनी भाडेकरूची नोंद करून पोलीस विभागाला सहकार्य करावे.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Policeपोलिस