शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना देणार दहा हजार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:13 IST

आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.

ठळक मुद्देपुस्तक दोस्ती उपक्रम : सचिन सावरकर यांची माहिती; वैचारिक वळण लावण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून माहिती देताना ते म्हणाले, दोन दशकांपासून विद्यार्थी वाचनापासून दूर गेलेला आहे. याची अनेक कारणे आहेत. नव्या पिढीच्या पालकांपासून तर शैक्षणिक धोरणापर्यंत ही लांबलचक यादी आहे. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी आग्रही असणारी पालकांची पिढी आजच्या शिक्षणातून निर्माण झाली आहे. मुलांविषयी पालकांच्या चेहऱ्यावर कायम चिंतेचे जाळे पाहावयास मिळते. एक सजग पालक व शिक्षक म्हणून पुस्तक वाचनातूनच बुद्धीला चालना मिळू शकते. समाजाला समजावून घेणारी पिढी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठीच ही पुस्तक दोस्ती चळवळ राबविली जात आहे. सर्वत्र चंगळवाद फोफावत असताना पुस्तक दोस्ती चळवळ विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी ठरू शकते. समाजमनाला वैचारिक वळण लावण्याचे कामही या चळवळीच्या माध्यमातून होऊ शकेल, असा विश्वास सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.युनेस्कोने २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून घोषित केला आहे. १९९५ पासून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात पुस्तक दोस्ती उपक्रम या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेत असते. यंदाही पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.- सचिन सावरकर, प्रणेते, पुस्तक दोस्ती उपक्रम.