शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना देणार दहा हजार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:13 IST

आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.

ठळक मुद्देपुस्तक दोस्ती उपक्रम : सचिन सावरकर यांची माहिती; वैचारिक वळण लावण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आज शालेय विद्यार्थी, युवक यांचे हात इंटरनेट आणि सोशल मीडियावर व्यस्त झाले आहेत. त्यातील ज्ञान मिळविण्यातच ते धन्यता मानत आहेत. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आवश्यक गरज म्हणून पुस्तकांचे वाचन व्हायलाच हवे, या उद्देशाने पुस्तक दोस्ती अभियानातून जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दहा हजार पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते सचिन सावरकर यांनी जाहीर केला.२३ एप्रिल या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून माहिती देताना ते म्हणाले, दोन दशकांपासून विद्यार्थी वाचनापासून दूर गेलेला आहे. याची अनेक कारणे आहेत. नव्या पिढीच्या पालकांपासून तर शैक्षणिक धोरणापर्यंत ही लांबलचक यादी आहे. परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी आग्रही असणारी पालकांची पिढी आजच्या शिक्षणातून निर्माण झाली आहे. मुलांविषयी पालकांच्या चेहऱ्यावर कायम चिंतेचे जाळे पाहावयास मिळते. एक सजग पालक व शिक्षक म्हणून पुस्तक वाचनातूनच बुद्धीला चालना मिळू शकते. समाजाला समजावून घेणारी पिढी निर्माण करता येऊ शकते. त्यासाठीच ही पुस्तक दोस्ती चळवळ राबविली जात आहे. सर्वत्र चंगळवाद फोफावत असताना पुस्तक दोस्ती चळवळ विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी ठरू शकते. समाजमनाला वैचारिक वळण लावण्याचे कामही या चळवळीच्या माध्यमातून होऊ शकेल, असा विश्वास सावरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.युनेस्कोने २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून घोषित केला आहे. १९९५ पासून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात पुस्तक दोस्ती उपक्रम या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेत असते. यंदाही पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.- सचिन सावरकर, प्रणेते, पुस्तक दोस्ती उपक्रम.