शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वाघाने पाडला दहा शेळ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:28 IST

तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपरिसरात दहशत : १.२० लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/कोरा : तालुक्यातील धामणगाव (गाठे) गावालगत असलेल्या गोठ्यात बांधून आलेल्या शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून दहा बकऱ्यांना गतप्राण केले. तर एका बकरी गंभीर जखमी केल्याने शेळी पालकाचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे. नुकसानग्रस्त शेळीपालकाला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. या घटना शनिवारी पहाटे घडली असून सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, धामणगाव येथील शेतकरी वसंतराव आडे यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाची जोड दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरा त्यांनी सर्व शेळ्या नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्यात बांधून ते घराकडे परतले. परंतु, शनिवारी पहाटे याच शेळ्यांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून दहा शेळ्यांना ठार करीत एका शेळीला गंभीर जखमी केले. तर पाच शेळ्यांनी वाघाच्या तावडीतून कसाबसा पळ काढल्याने त्या बचावल्या.या घटनेमुळे शेतकरी आडे यांचे सुमारे १.२० लाखांचे नुकसान झाले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच. एन. नरडंगे, वनरक्षक प्रिया सावरकर, वनमित्र प्रकाश सहारे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद वन विभागाने घेतली आहे.लोकप्रतिनिधींकडून नुकसानग्रस्तांचे सांत्वनसदर घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य रोषण चौके, पं.स. सदस्य वसंतराव घुमडे यांनी घटनास्थळ गाठून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन केले. शिवाय त्यांनी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे.घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दीवाघाने हल्ला करून दहा शेळ्यांना ठार केल्याच्या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या घटनेमुळे धामणगावसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ