शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे तापमानाचा तडाखा

By admin | Updated: March 23, 2016 02:06 IST

खेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे

श्रेया केने ल्ल वर्धाखेडे ओस होत असून शहरी भाग झपाट्याने वाढत आहेत. या सोबतच शहरात काँक्रिटीकरणही वाढत आहे. या काँक्रिटीकरणामुळे वातावरणातील उष्णताशोषक घटकांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. उष्णताशोषक घटकांच्या झालेल्या ऱ्हासामुळेच तापमानात वाढ होत असल्याची बाब निरीक्षणातून वैज्ञानिकांच्या निदर्शनात आली आहे. यातून बचावाकरिता नागरिकांत जागृती निर्माण करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या संदर्भात भारतीय वेधशाळेकडून निरीक्षण नोंदविले जातात. यात निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप हवामान बदलास कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. वाढत्या शहरीकरणासह काँक्रिटीकरण झपाट्याने होत आहे. पूर्वी कच्चे रस्ते असायचे. आता झगमगटाच्या नावाखाली शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातूनही कच्चे रस्ते हद्दपार झाले आहे. सर्रास सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. शिवाय घरबांधकामातही सिमेंट, काँक्रिटचा वापर होत आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेत तर मोठ्या इमारती निर्माण होत काँक्रिटचे जंगल तयार होवू लागले आहे. या काँक्रिटीकरणाकरिता झाडांची कत्तल होत असून हिरव्या जंगलाऐवजी सिमेंटचे जंगल वाढत आहे. यामुळे उष्णताशोषक घटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रखर सूर्यकिरणांना शोषून वातावरण शीत राखण्यास मदत करणारे घटक कमी होवून उष्णता परावर्तीत करणाऱ्या घटकांमध्ये वाढ होवू लागली आहे. बदलत्या जीवन शैलीसह वापरात येणाऱ्या विविध साधनांमुळे उष्णतामान वाढविणाऱ्या घटकांत भरच पडत आहे. यासह दळणवळणाची साधने, त्यातून होणारे प्रदूषण, तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यातील वनसंपदा, वनक्षेत्र कायम असले तरीही मानवी वस्तीचा विस्तार होताना त्या परिसरातील झाडांची कत्तल होत आहे. याला पर्याय म्हणून वृक्षारोपण होत असले तरीही त्याची गती मंद आहे. तुलनेने झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा थेट परिणाम हवामान बदलाच्या स्वरूपात मानवाला भोगावा लागत असून फेब्रुवारी महिन्यातच पारा ३५ अंशापुढे गेला आहे. याविषयी जागरूकता बाळगण्याची गरज असल्याचे मत वैज्ञानिकांनी नोंदविले आहे.४हवामान बदलामुळे मानवासह प्राणिमात्रांना अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एक म्हणजे ऋतूबद्दल उन्हाळ्यात वाढलेला कालावधी. या सर्व परिणामांपासून निसर्गाचे रक्षण करण्याकरिता जागतिक स्तरावर प्रयत्न होत असून जागरूकता निर्माण करण्यासाठी २३ मार्च हा हवामान दिन म्हणून साजरा केला आहे. शासनस्तरावर हा दिन साजरा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असून याशिवाय प्रत्यक्षात कृती करण्याची गरज वैज्ञानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.वाढते काँक्रिटीकरण उष्णता वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे. मानवी वस्ती व परिसरातून उष्णता शोषक घटक बाद होत असून तापमान वाढीस हे घटक जबाबदार आहेत. एकाएकी तापमान वाढल्याने समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक गतिमान होते. परिणामी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढून पाऊस पडतो. वेळीअवेळी होणाऱ्या पावसाचे हे देखील मुख्य कारण आहे.- बी. एस. आवळे, सहायक वैज्ञानिक, भारतीय वेधशाळा, नागपूर विभाग, जि. नागपूर.