शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा पीएम साहेब...! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:24 IST

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

ठळक मुद्देविजय जावंधिया यांचा सवाल :अमेरिकेच्या कापूस व्यापारात मंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या बाता करीत आहे. परंतु हल्ली अमेरीकेच्या कापूस बाजारात ३० टक्केपर्यंत मंदी आली असून या स्थितीत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने २०१८-१९ या वर्षात कापसाचा हमी भाव ५ हजार ४५० रुपये जाहीर केला होता. पण, यावर्षात रुपयाचे अवमुल्यन आणि सरकीच्या किंमतीमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या हमी भावापेक्षा जास्त दर मिळाले. अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे दर खुप जास्त वाढलेले नव्हते. ते २०११ पेक्षाही कमी ८० ते ९० सेंटे प्रती पाऊण्ड इतके होते. यानुसार ३५ किलो रुईची किंमत (७० रुपये प्रती डॉलरनुसार) ४ हजार ३१२ रुपये होते. त्यावर्षी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने सरकीची व्रिकी करण्यात आली. १ क्विंटल कापसापासून ६४ किलो सरकी मिळते. सरासरी ३० रुपये किलो सरकीच्या दराने १ हजार ९२० रुपये होतात. याचाच अर्थ असा की १ क्विंटल कापसापासून ४ हजार ३१२ रुपयाची रुई आणि १ हजार ९२० रुपयाची सरकी असे एकूण ६ हजार २३२ रुपये होतात. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास यावर्षी २०१९-२० करीता कृषी मूल्य आयोगाने कापसाच्या हमी भावात केवळ १०० रुपये प्रती क्विंटल वाढ करुन ५ हजार ५५० रुपये केला आहे. आजच्या स्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे भाव ७० सेंट प्रती पाऊण्डपर्यंत खाली आले आहे. भारताचा रुपयाही ७० रुपयावर स्थिरावला आहे. जगभरात सोयाबीन ढेपीच्या दरातही मंदी आली आहे. परिणमी भारतात सरकी ढेपही मंदीच्या सावटात आहे. जेव्हा नवीन कापूस बाजारपेठेत येईल तेव्हा रुई आणि सरकीचे दर आणखी कमी होईल. त्यामुळे यावर्षी कापूस ५ हजार ५५० रुपयाच्या हमीभावातही विकल्या जाणार नाही. एकीकडे कापसाची आयात वाढत आहे. मागील वर्षी १५ लाख गाठी तर यावर्षी ३० लाखापेक्षा जास्त गाठी आयात करण्यात आल्या. कापूस आयातीवर कुठलाही कर नाही. अशा स्थितीत ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये दरात कापूस विकणारे शेतकरी ५ हजार २०० ते ५ हजार ५५० रुपयात कापूस विकेल तर त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पत्रातून केला असून योग्य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी