शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

सांगा पीएम साहेब...! शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:24 IST

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

ठळक मुद्देविजय जावंधिया यांचा सवाल :अमेरिकेच्या कापूस व्यापारात मंदी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या बाता करीत आहे. परंतु हल्ली अमेरीकेच्या कापूस बाजारात ३० टक्केपर्यंत मंदी आली असून या स्थितीत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने २०१८-१९ या वर्षात कापसाचा हमी भाव ५ हजार ४५० रुपये जाहीर केला होता. पण, यावर्षात रुपयाचे अवमुल्यन आणि सरकीच्या किंमतीमध्ये तेजी आल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या हमी भावापेक्षा जास्त दर मिळाले. अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे दर खुप जास्त वाढलेले नव्हते. ते २०११ पेक्षाही कमी ८० ते ९० सेंटे प्रती पाऊण्ड इतके होते. यानुसार ३५ किलो रुईची किंमत (७० रुपये प्रती डॉलरनुसार) ४ हजार ३१२ रुपये होते. त्यावर्षी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दराने सरकीची व्रिकी करण्यात आली. १ क्विंटल कापसापासून ६४ किलो सरकी मिळते. सरासरी ३० रुपये किलो सरकीच्या दराने १ हजार ९२० रुपये होतात. याचाच अर्थ असा की १ क्विंटल कापसापासून ४ हजार ३१२ रुपयाची रुई आणि १ हजार ९२० रुपयाची सरकी असे एकूण ६ हजार २३२ रुपये होतात. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास यावर्षी २०१९-२० करीता कृषी मूल्य आयोगाने कापसाच्या हमी भावात केवळ १०० रुपये प्रती क्विंटल वाढ करुन ५ हजार ५५० रुपये केला आहे. आजच्या स्थितीत अमेरीकेच्या बाजारपेठेत रुईचे भाव ७० सेंट प्रती पाऊण्डपर्यंत खाली आले आहे. भारताचा रुपयाही ७० रुपयावर स्थिरावला आहे. जगभरात सोयाबीन ढेपीच्या दरातही मंदी आली आहे. परिणमी भारतात सरकी ढेपही मंदीच्या सावटात आहे. जेव्हा नवीन कापूस बाजारपेठेत येईल तेव्हा रुई आणि सरकीचे दर आणखी कमी होईल. त्यामुळे यावर्षी कापूस ५ हजार ५५० रुपयाच्या हमीभावातही विकल्या जाणार नाही. एकीकडे कापसाची आयात वाढत आहे. मागील वर्षी १५ लाख गाठी तर यावर्षी ३० लाखापेक्षा जास्त गाठी आयात करण्यात आल्या. कापूस आयातीवर कुठलाही कर नाही. अशा स्थितीत ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपये दरात कापूस विकणारे शेतकरी ५ हजार २०० ते ५ हजार ५५० रुपयात कापूस विकेल तर त्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, असा सवाल शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पत्रातून केला असून योग्य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी