शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

गृह अलगीकरणातील कोविड बाधितांवर ‘टेलिफोनीक वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

ठळक मुद्देदररोज भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून डॉक्टर जाणून घेतात रुग्णाच्या प्रकृतीची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आठ हजाराहून अधिक झाली असली तरी लक्षणविरहित आणि कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील विविध भागात लक्षणविरहित आणि कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या एकूण ३०४ कोविड बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

डॉक्टरांची विशेष चमू राहते हायअलर्टवर

 एखाद्या लक्षणविरहित तसेच सैाम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधिताने स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर त्या रुग्णाचे घर होम आयसोलेशनसाठी उत्तम आहे काय याची पाहणी केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला होम आयसोलेशनसाठी रितसर परवानगी दिली जाते. या रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देत त्यास आवश्यक औषधसाठा दिला जातो. इतकेच नव्हे तर तालुका स्तरावर डॉक्टरांची विशेष चमू नेहमीच हायअलर्टवर राहते.

 गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाला कोविड वॉर रुममधून दिवसातून किमान दोन वेळा वैद्यकीय तज्ज्ञ फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारणा करतात. रुग्णाची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच तालुकास्तरावरील डॉक्टरांची चमू त्यास तातडीने नजीकच्या कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात दाखल करतात. इतकेच नव्हे तर गृहअलगीकरणा विषयीचा आढावा जिल्हाधिकारी स्वत: वेळोवेळी घेतात.

सध्या ३०४ कोविड बाधित होम आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. दररोज त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली जाते. प्रकृती ढासळल्यास रुग्णास रुग्णालयात दाखल केले जाते.- डॉ. अजय डवले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

जिल्ह्यात ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण रविवारी जिल्ह्यात ४६ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या ८,१४० झाली आहे. तर आज ५३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला असून जिल्ह्यात सध्या ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. त्यांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या