शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

तहसील कार्यालयात आलबेल

By admin | Updated: May 23, 2014 00:10 IST

पांदण रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता अडविल्याने शेतकर्‍यांना वहीवाटीस अडथळा येत आहे. याबाबत शेतकर्‍याने तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या घ़टनेला दहा वर्षांचा

झडशी : पांदण रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता अडविल्याने शेतकर्‍यांना वहीवाटीस अडथळा येत आहे. याबाबत शेतकर्‍याने तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या घ़टनेला दहा वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. ता घटनेतून सेलू तहसील कार्यालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. नजीकच्या मौजा हिवरा येथील दोन शेतकर्‍यांनी पांदण रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. याबाबत शेतकरी दादाराव बा. ठवकर यांनी सन २००३-०४ मध्ये गैरअर्जदार भाऊराव महादेव बावणे, तुकाराम महादेव बावणे या दोघाविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीत शासकीय शिव पांदणीवर अतिक्रमण करुन वहीवाट करीत असल्याची तक्रारीत नमूद केले होते. तत्कालीन तहसीलदार सेकू यांच्याकडे ही तक्रार दाखल केली होती. २००४ मध्ये अर्जदार ठवकर यांनी तहसील कार्यालयात संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केली. यानंअतर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोक्का तपासणी केली. तसेच तहसीलदार यांनी प्राप्त अहवालानुसार आदेश जारी केला. यात गैरअर्जदार बावणे व इतर अतिक्रमण करणार्‍या शेतकर्‍यांना शिव पांदण मोकळी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. अर्जदार दादाराव ठवकर यांनी वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली नाही. अद्याप महसूल विभागातील एकही अधिकार्‍याला शासकीय शिव पांदण मोकळी करण्याची तसदी केली नाही. अन्यायग्रस्त शेतकर्‍याला कधी न्याय मिळणार याकडे परिसरातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. आगामी पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी शिव पांदणीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आहे. तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना मोक्का चौकशी करुन तहसीलदार यांच्या समक्ष अहवाल पेश केला. तसेच नायब तहसीलदार यांनी कार्र्यालयीन पत्र पाठवून भूमिअभिलेख कार्यालय पाठविले. सर्व अधिकारी मोक्यावर हजर राहुन आपल्या शिव पांदण रस्त्याची हद्द कायम करणे गरजेचे होते. परंतु नायब तहसीलदार यांनी शेतकर्‍यांना अधिकार्‍याकडे जावून हद्द कायम करुन या, असे सांगितले. यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अतिक्रमण हटविण्याकरिता तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला असता कार्यालयातील कर्मर्‍यांकडून टोलवाटोलविचे उत्तरे देण्यात येते. यामुळे शेतकर्‍यांना तहसील कार्यालयाच्या घिरट्या माराव्या लागतात. या समस्येची दखल पदसिद्ध तहसीलदार घेणार का, शेतकर्‍यांना न्याय मिळणार का, अतिक्रमण हट्ट्विले जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. अन्यायग्रस्त शेतकर्‍यांना कारवाईची प्रतीक्षा आहे. बरेचदा शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. दप्तर दिरगांई होत असेल तर याला कोण जबाबदार आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. तहसील कार्यालयात जावून महिनोंगणती काम न होणे हे न उलगडणारे कोडे ठरत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)