शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिक्षकांची झेडपीवर धडक

By admin | Updated: March 8, 2015 01:48 IST

नवीन वेतन प्रणाली लागू झाली त्या काळापासूनच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला.

वर्धा : नवीन वेतन प्रणाली लागू झाली त्या काळापासूनच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्यावतीने शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षणधिकारी व शिक्षण विभागाच्या इतर अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एप्रिल महिन्यापासून शिक्षकांचे वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत करण्यात येईल या लेखी आश्वासनावर माघार घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गत दोन तीन महिन्यांपासून आनागोंदी पसरली आहे. या विरोधात शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता असलेल्या जिल्ह्यातील विविध संघटनांनी मुख्यकार्यपालन अधिकारी व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढण्याची मागणी केली; मात्र त्यावर काहीच तोडगा निघाला नाही. मार्च महिना उजाडला जरी शिक्षकांना जानेवारी महिन्याचे वेतन मिळाले नाही. शिवाय इतर समस्यांही डोके वर काढत आहेत. यावर मार्ग काढण्याकरिता शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण विभागाला नोटीस देत यावर मार्ग काढण्याची मागणी केली होती. त्याचवेळी याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष जि.प. प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही दिला होता. यात शिक्षण विभागाच्यावतीने काहीच कार्यवाही करण्यात आली नाही, यामुळे समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.