शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांना सातबाराच्या आधारावर केजी टू पीजी शिक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:46 IST

एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या वतीने शेतकऱ्यांना मुलांना जात प्रमाणपत्राऐवजी सातबारा दाखल करून घेऊन अंगणवाडी ते अभियांत्रिकी, वैद्यकीय मोफत शिक्षण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक मसुद्यात तरतूद करण्याची मागणीएकच मिशन शेतकरी आरक्षणचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जाहीर केला आहे. यावर सूचना करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या अनुषंगाने एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या वतीने शेतकऱ्यांना मुलांना जात प्रमाणपत्राऐवजी सातबारा दाखल करून घेऊन अंगणवाडी ते अभियांत्रिकी, वैद्यकीय मोफत शिक्षण देण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.एकच मिशन शेतकरी आरक्षण ही चळवळ मागील चार वर्षांपासून सेवाग्राम येथून सुरू झाली असून आतापर्यंत राज्यातील १६०० ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी शेतकरी आरक्षणाचे ठराव पारित करून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. याशिवाय जगभरातील ७ लाख शेतकरी, शेतकरी पुत्र, बुद्धिजीवी यांनी या चळवळीला पाठिंंबा दिला आहे. देशात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक असमतोल निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी व्यापक उपाययोजना एकच मिशन शेतकरी आरक्षणाने सुचविले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची मुले कौटुंबिक समस्येमधून सहजासहजी अभियांत्रिकी, ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्याला शिक्षण, नोकरी व पदोन्नतीत आरक्षण द्यावे, आरटीईद्वारे आर्थिक दुर्बंलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यात कॉन्व्हेंट ते दहावीपर्यंत शुल्क माफ केले जात होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मुलांना सातबारा दाखल करून घेऊन उच्च शिक्षणातही आरक्षणाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याची तरतूद करावी. ज्यांच्याकडे सातबारा, त्याला ही सवलत लागू करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक कर्जातही सुलभ हप्ते व त्याच्या परतफेडीचे मार्ग उपलब्ध करून द्यावे, कर्जावरील व्याजदर कमी करण्यात यावा, सध्या चार लाखांच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढवून देत शैक्षणिक संस्थांच्या दर्जानुसार शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व समावेशक खर्चाची १०० टक्के रक्कम कर्ज म्हणून देण्यात यावी, तेव्हाच शहरी व ग्रामीण भागातील शैक्षणिक असमतोल दूर होईल.

शैक्षणिक धोरणात व्यापक बदल हवाशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वातावरण शहरी भागातील वातावरणापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शिकून येणारा शेतकऱ्याचा मुलगा शहरी वातावरणाशी अनुरूप होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी करताना नव्या शैक्षणिक धोरणात व्यापक बदल करणे आवश्यक आहे. जेणेकरून शहरातील मुलांप्रमाणेच शेतकऱ्यांची मुले शैक्षणिक वातावरणात स्वत:ला मिसळू शकतील.

मागील चार वर्षांपासून एकच मिशन शेतकरी आरक्षण ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. यात शेतकरी हिताचे व्यापक धोरण कसे असावे, याचा समावेश आहे. यात शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबतही उल्लेख आहे. देशाचे तत्कालीन मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही याच्या प्रती देण्यात आल्या आहे. नव्या शैक्षणिक मसुद्यात या बाबींचा समावेश करावा.शैलेश अग्रवाल, प्रणेते, एकच मिशन, शेतकरी आरक्षण.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र