शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसानंतर येणार नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:35 IST

पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले.

ठळक मुद्देजलवाहिनी फुटल्याचा परिणाम। दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले. याच जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम आता अंतिमटप्प्यात आले असून मुख्य जलवाहिनी फुटल्याच्या घटनेमुळे नागरिकांना तीन दिवस उशीराने नळ योजनेद्वारे वर्धा न.प. प्रशासन पाणी पुरवठा करणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकारी सांगितले.नालवाडी भागात मुख्य जलवाहिनी सोमवार ६ मे रोजी अचानक फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. सदर घटना लक्षात येताच वर्धा न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. सध्या हे दुरूस्तीचे काम अंतीम टप्प्यात आले असून दुरूस्तीचे काम शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत पूर्णत्त्वास जाणार आहे. दुरूस्तीचे काम अवघ्या दोन दिवसात पूर्ण होईल असा अंदाज असताना त्याला सहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच न.प.द्वारे केल्या जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वर्धा शहरातील ज्या भागातील नळांना रविवारी पाणी येणार होते ते आता तीन दिवसानंतर येणार आहे. तसेच इतर भागातील नळालाही तीन दिवसा उशीरानेच पाणी येणार आहे. परिणामी, नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन वर्धा न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.आठ टँकरद्वारे पाणीपुरवठामुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी समस्या भीषण रुप धारण करू पाहत होती. त्यावर मात करण्यासाठी न.प. प्रशासनाने सोमवारनंतर शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. शुक्रवारी एकूण आठ टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. एका टँकरने सुमारे चार फेऱ्या मारल्याची नोंद न.प.ने घेतली आहे.खंडित होणारा विद्युत पुरवठा ठरतोय डोकेदुखीशनिवारी वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना पाच टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु, खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात असला तरी खासगी टँकरवर होणारा खर्च लाखाच्या आत कसा ठेवता येईल यावर पालिका प्रशासन लक्ष केंद्रीत करून आहे.

टॅग्स :Waterपाणी