शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

तीन दिवसानंतर येणार नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:35 IST

पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले.

ठळक मुद्देजलवाहिनी फुटल्याचा परिणाम। दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पवनार येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नालवाडी भागातील डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयासमोर फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर पाणी वाहून गेले. याच जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम आता अंतिमटप्प्यात आले असून मुख्य जलवाहिनी फुटल्याच्या घटनेमुळे नागरिकांना तीन दिवस उशीराने नळ योजनेद्वारे वर्धा न.प. प्रशासन पाणी पुरवठा करणार असल्याचे पालिका प्रशासनातील अधिकारी सांगितले.नालवाडी भागात मुख्य जलवाहिनी सोमवार ६ मे रोजी अचानक फुटल्याने सुमारे ३० हजार लिटर स्वच्छ पाणी वाहून गेले. सदर घटना लक्षात येताच वर्धा न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने युद्धपातळीवर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. सध्या हे दुरूस्तीचे काम अंतीम टप्प्यात आले असून दुरूस्तीचे काम शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत पूर्णत्त्वास जाणार आहे. दुरूस्तीचे काम अवघ्या दोन दिवसात पूर्ण होईल असा अंदाज असताना त्याला सहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच न.प.द्वारे केल्या जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून वर्धा शहरातील ज्या भागातील नळांना रविवारी पाणी येणार होते ते आता तीन दिवसानंतर येणार आहे. तसेच इतर भागातील नळालाही तीन दिवसा उशीरानेच पाणी येणार आहे. परिणामी, नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन वर्धा न.प.च्यावतीने करण्यात आले आहे.आठ टँकरद्वारे पाणीपुरवठामुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी समस्या भीषण रुप धारण करू पाहत होती. त्यावर मात करण्यासाठी न.प. प्रशासनाने सोमवारनंतर शहरातील काही भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. शुक्रवारी एकूण आठ टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. एका टँकरने सुमारे चार फेऱ्या मारल्याची नोंद न.प.ने घेतली आहे.खंडित होणारा विद्युत पुरवठा ठरतोय डोकेदुखीशनिवारी वर्धा शहरातील काही भागातील नागरिकांना पाच टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु, खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. सध्या टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात असला तरी खासगी टँकरवर होणारा खर्च लाखाच्या आत कसा ठेवता येईल यावर पालिका प्रशासन लक्ष केंद्रीत करून आहे.

टॅग्स :Waterपाणी