शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

टाकळीला पंचधारा नदीच्या पुराचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:39 IST

सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे

मदतीची मागणी : आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव वर्धा : सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे. अल्पशा पुरानंतर पाणी गावात शिरत असल्याने नदीकाठावरील घरे व रहिवाशी असुरक्षित झाले आहे. प्रशासनाकरवी आपत्ती व्यवस्थापनाचा कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवाल यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. पंचधारा नदीच्या काठावर टाकळी (झडशी) हे गाव वसले आहे. नदीला थोडा जरी पूर आला तरी पुराचे पाणी येथील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. या पुराचा धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. पुरामुळे असुरक्षिततेत जीवन जगणाऱ्या येथील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार केली. याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील घरांना पुरापासून धोका आहे. येथे बांधलेले ओटे आणि बांध खचत आहेत. पूर वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेची हानी व जीवितास धोका आहे. निवेदन देताना डॉ. सतीश सावरकर, विष्णू सावरकर, प्रफुल्ल सावरकर, गजानन दोडके आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी) अल्पशा पुरानंतर गावात शिरते पाणी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंचधारा नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी हल्ली घरापर्यंत पोहोचले आहे. नदी काठावरील घरांसमोर असलेला अर्धाअधिक रस्ता हा पाण्यात असून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात जागुनच रात्र काढावी लागते. आणखी किती दिवस पुरावर लक्ष ठेवण्याकरिता येथील नागरिकांच्या नशीब रात्रीची झोप येणार नाही हे सांगणे कठीण आहे. नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. आता बांधलेले ओटे किंवा टाकलेले बांध खचु लागले आहेत. आताच पुराचे पाणी घरापर्यंत पोहोचते आहे.