शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

टाकळीला पंचधारा नदीच्या पुराचा धोका

By admin | Updated: August 4, 2016 00:39 IST

सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे

मदतीची मागणी : आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव वर्धा : सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) गावलगत वाहणाऱ्या पंचधारा नदीमुळे ग्रामस्थांना धोका उत्पन्न झाला आहे. अल्पशा पुरानंतर पाणी गावात शिरत असल्याने नदीकाठावरील घरे व रहिवाशी असुरक्षित झाले आहे. प्रशासनाकरवी आपत्ती व्यवस्थापनाचा कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवाल यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. पंचधारा नदीच्या काठावर टाकळी (झडशी) हे गाव वसले आहे. नदीला थोडा जरी पूर आला तरी पुराचे पाणी येथील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचते. या पुराचा धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. पुरामुळे असुरक्षिततेत जीवन जगणाऱ्या येथील नागरिकांनी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडे वारंवार केली. याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथील घरांना पुरापासून धोका आहे. येथे बांधलेले ओटे आणि बांध खचत आहेत. पूर वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेची हानी व जीवितास धोका आहे. निवेदन देताना डॉ. सतीश सावरकर, विष्णू सावरकर, प्रफुल्ल सावरकर, गजानन दोडके आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी) अल्पशा पुरानंतर गावात शिरते पाणी सतत सुरू असलेल्या पावसामुळे पंचधारा नदीला पुर आला आहे. या पुराचे पाणी हल्ली घरापर्यंत पोहोचले आहे. नदी काठावरील घरांसमोर असलेला अर्धाअधिक रस्ता हा पाण्यात असून येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात जागुनच रात्र काढावी लागते. आणखी किती दिवस पुरावर लक्ष ठेवण्याकरिता येथील नागरिकांच्या नशीब रात्रीची झोप येणार नाही हे सांगणे कठीण आहे. नागरिकांनी घरापासून काही अंतरावर म्हणजेच नदी काठावर उंचवट भाग तयार केला. त्यात काहींनी उंच ओटे तर काहींन मलबा टाकून उंचवट बांध तयार केले आहे. त्यामुळे नदीचे पाणी त्याला अडून घरापर्यंत येत नव्हते. आता बांधलेले ओटे किंवा टाकलेले बांध खचु लागले आहेत. आताच पुराचे पाणी घरापर्यंत पोहोचते आहे.