शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
2
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
3
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
4
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
5
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
6
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
7
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
8
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
9
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
10
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
11
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
12
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
13
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
14
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
15
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
16
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
17
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
18
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
19
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
20
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो

तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नामफलकाला हार

By admin | Updated: May 17, 2016 01:48 IST

तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे

 बोगस भुईमूग बियाणे प्रकरण : निवेदनानंतरही कारवाई नाही आष्टी (शहीद) : तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे दिले. हे बियाणे उगवले मात्र त्याला शेंगाच आल्या नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. याचे निवेदन कृषी विभागाला देण्यात आले. यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने संतप्तालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. येथे निषेध नोंदवीत अधिकाऱ्याच्या नामफलकाला पुष्पहार घातला. विशेष म्हणजे नामफलकावर असलेला अधिकारी चार वर्षापूर्वीच बदलून गेला आहे.शेतकऱ्यांच्या या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, तालुका सरचिटणीस राजेश ठाकरे यांच्यासह शेतकरी कार्यालयात हजर झाले. राजेश ठाकरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना भ्रमणध्वनी करून प्रकरणाची माहिती दिली. लागलीच खा. रामदास तडस यांनाही माहिती दिली. यावर खा. तडस यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांना प्रकरणात तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. दोन दिवसात कारवाई करण्यात न झाल्यास संपूर्ण शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. ४तारासावंगा- उन्हाळी हंगामात आष्टी तालुका कृषी विभागामार्फत महाराष्ट्रासाठी भुईमुगाचे टीएजी २४ बियाने प्रस्तावित होते. असे असताना कृषी विभागामार्फत के ६ या जातीचे बियाणे ५० टक्के अनुदानावर शेतकर्ऱ्यांना वाटप करण्यात आले पण या बियानाला शेंगाच न आल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले बियाणे महाराष्ट्रातील वातावरणाला साथ न देणारे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भुईमूग बियाणे नॅशनल सीड कॉर्पोरेशन मार्फत घेतलेले आहे. बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. यासंदर्भात तपासणी सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे. बियाण्याला शेंगा लागल्या नाही, असा प्रकार प्रथमच झाला आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धाभुईमूग बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. याची दखल घेवून पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला. जिल्हा समिती यावर निर्णय घेणार. बियाणे उगविले मात्र नेमका दोष काय, याचे संशोधन सुरू आहे.- अरूण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी