शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी अधिकाऱ्याच्या नामफलकाला हार

By admin | Updated: May 17, 2016 01:48 IST

तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे

 बोगस भुईमूग बियाणे प्रकरण : निवेदनानंतरही कारवाई नाही आष्टी (शहीद) : तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने अंतोरा व तारासावंगा येथील शंभरावर शेतकऱ्यांना उन्हाळी भुईमुगाचे बियाणे दिले. हे बियाणे उगवले मात्र त्याला शेंगाच आल्या नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. याचे निवेदन कृषी विभागाला देण्यात आले. यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने संतप्तालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले. येथे निषेध नोंदवीत अधिकाऱ्याच्या नामफलकाला पुष्पहार घातला. विशेष म्हणजे नामफलकावर असलेला अधिकारी चार वर्षापूर्वीच बदलून गेला आहे.शेतकऱ्यांच्या या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप, तालुका सरचिटणीस राजेश ठाकरे यांच्यासह शेतकरी कार्यालयात हजर झाले. राजेश ठाकरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना भ्रमणध्वनी करून प्रकरणाची माहिती दिली. लागलीच खा. रामदास तडस यांनाही माहिती दिली. यावर खा. तडस यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांना प्रकरणात तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. दोन दिवसात कारवाई करण्यात न झाल्यास संपूर्ण शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. ४तारासावंगा- उन्हाळी हंगामात आष्टी तालुका कृषी विभागामार्फत महाराष्ट्रासाठी भुईमुगाचे टीएजी २४ बियाने प्रस्तावित होते. असे असताना कृषी विभागामार्फत के ६ या जातीचे बियाणे ५० टक्के अनुदानावर शेतकर्ऱ्यांना वाटप करण्यात आले पण या बियानाला शेंगाच न आल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेले बियाणे महाराष्ट्रातील वातावरणाला साथ न देणारे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भुईमूग बियाणे नॅशनल सीड कॉर्पोरेशन मार्फत घेतलेले आहे. बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. यासंदर्भात तपासणी सुरू आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे. बियाण्याला शेंगा लागल्या नाही, असा प्रकार प्रथमच झाला आहे.- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धाभुईमूग बियाणे उगविले मात्र शेंगा लागल्या नाही. याची दखल घेवून पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविला. जिल्हा समिती यावर निर्णय घेणार. बियाणे उगविले मात्र नेमका दोष काय, याचे संशोधन सुरू आहे.- अरूण बलसाने, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी