शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

महात्मा गांधींचे आदीनिवास टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:46 IST

येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात पारंपरिक पद्धतीने उपाययोजना : पर्यटकांना काही दिवस या इमारत परिसरात ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. ही दुरूस्ती करताना मुख्य इमारतीत कुठलाही फरक पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.आश्रमाला बरेच वर्ष झाले असून येथील प्रत्येक इमारत माती, कुड, बल्ली, बांबू, बोरे, कवेलू आदि स्थानिक साहित्याच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. यामुळे त्या वास्तुची वर्षाला ऋतू बदलताच सुरक्षा करावी लागते. सध्या परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने या छाताची दैनावस्था झाली आहे. शिवाय या दिवसात छतावरील कवेलू फेरावे लागतात.आश्रमातील या पहिल्या कुटीचा मागचा भाग वाकल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. कुटी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यांच्या जतन व संरक्षणाच्या दृष्टीने बल्ली व बांबूवर विशेष प्रक्रिया करण्यात येत आहे. बांबू मोरचूद, गोमुत्र, निंबोळी अर्क इत्यादीच्या मिश्रणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून मागील भाग तशाचा तसा नव्याने बनविण्यात येत आहे. ही दुरूस्ती २० ते २५ वर्षानंतर होत असल्याची माहिती अधीक्षक भावेष चव्हाण यांनी दिली. लवकरच नव्याने मागचा भाग तयार होवून दर्शनार्थी पाहू शकेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या हे काम जोरात असून ते लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.१०० रुपयांत तयार झाले होते आदिनिवास१९३६ मध्ये गांधजींनी शेगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जमनालाल बजाज यांच्या मालकीच्या शेतातील जांबाच्या बागेत अस्थाई झोपडी करून गांधीजी सहकाऱ्यांसोबत राहिले. चार-पाच दिवसानंतर ते चरखा यात्रेसाठी निघाले. या ठिकाणी राहण्याच्या निर्णय झाल्यानंतर प्रथम कुटी बनविण्यासाठी काही अटी मीराबहन, बलवंतसिंग, मन्नालाल शहा यांनी समोर ठेवल्या. यात स्थानिक संसाधन कारागिर व १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च नको, असे सुद्धा सांगितले. बापू चरखा यात्रेला गेल्यानंतर प्रथम निवासस्थानच्या कामाला सुरूवात झाली. १६ जून १९३६ मध्ये बापू परत शेगावला आल्यानंतर याच कुटीमध्ये ते कस्तुरबा आणि अन्य सहकाºयांसोबत राहिले. १९४२ च्या ठरावाची बैठक सुद्धा याच कुटीत झाली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी