शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

महात्मा गांधींचे आदीनिवास टाकतेय कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:46 IST

येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रमात पारंपरिक पद्धतीने उपाययोजना : पर्यटकांना काही दिवस या इमारत परिसरात ‘नो एंट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. ही दुरूस्ती करताना मुख्य इमारतीत कुठलाही फरक पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.आश्रमाला बरेच वर्ष झाले असून येथील प्रत्येक इमारत माती, कुड, बल्ली, बांबू, बोरे, कवेलू आदि स्थानिक साहित्याच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. यामुळे त्या वास्तुची वर्षाला ऋतू बदलताच सुरक्षा करावी लागते. सध्या परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने या छाताची दैनावस्था झाली आहे. शिवाय या दिवसात छतावरील कवेलू फेरावे लागतात.आश्रमातील या पहिल्या कुटीचा मागचा भाग वाकल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. कुटी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यांच्या जतन व संरक्षणाच्या दृष्टीने बल्ली व बांबूवर विशेष प्रक्रिया करण्यात येत आहे. बांबू मोरचूद, गोमुत्र, निंबोळी अर्क इत्यादीच्या मिश्रणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून मागील भाग तशाचा तसा नव्याने बनविण्यात येत आहे. ही दुरूस्ती २० ते २५ वर्षानंतर होत असल्याची माहिती अधीक्षक भावेष चव्हाण यांनी दिली. लवकरच नव्याने मागचा भाग तयार होवून दर्शनार्थी पाहू शकेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या हे काम जोरात असून ते लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.१०० रुपयांत तयार झाले होते आदिनिवास१९३६ मध्ये गांधजींनी शेगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जमनालाल बजाज यांच्या मालकीच्या शेतातील जांबाच्या बागेत अस्थाई झोपडी करून गांधीजी सहकाऱ्यांसोबत राहिले. चार-पाच दिवसानंतर ते चरखा यात्रेसाठी निघाले. या ठिकाणी राहण्याच्या निर्णय झाल्यानंतर प्रथम कुटी बनविण्यासाठी काही अटी मीराबहन, बलवंतसिंग, मन्नालाल शहा यांनी समोर ठेवल्या. यात स्थानिक संसाधन कारागिर व १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च नको, असे सुद्धा सांगितले. बापू चरखा यात्रेला गेल्यानंतर प्रथम निवासस्थानच्या कामाला सुरूवात झाली. १६ जून १९३६ मध्ये बापू परत शेगावला आल्यानंतर याच कुटीमध्ये ते कस्तुरबा आणि अन्य सहकाºयांसोबत राहिले. १९४२ च्या ठरावाची बैठक सुद्धा याच कुटीत झाली होती.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी