शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2016 02:20 IST

पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

भारतीय विद्यार्थी सेना : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवर्धा : पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.पोलीस प्रशासन हे जनतेचे सुरक्षा कवच म्हणून ओळखल्या जाते. साऱ्या जनतेचे रक्षक हे पोलीस आहेत. कुठलीही सण असोत. चोवीस तास जनतेच्या सुरक्षिततेसाठी राबराब राबत असतात. जनता आनंदाने व उत्साहाने परिवारांसोबत सण साजरे करीत असताना तो मात्र आपल्या परिवार सोडून जनतेच्या सुरक्षेसाठी गस्त घालत असतो. जेव्हा अपघात होतो, दरोडा पडतो, छेडखानी किंवा चोरी होते, मारामाऱ्या होतात तेव्हा सगळ्या जनतेला पोलिसांचाच आधार घ्यावा लागतो व पोलीसही समस्या सोडवायला अर्ध्या रात्री धावून येतात. पण सध्या महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, या बाबत निवेदनातून निषेधही नोंदविण्यात आला. पोलीस विलास शिंदे हे त्यांना झालेल्या मारहाणीत शहीद झाले. धुळ्यामध्येही एका जमावाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. एका पोलीस कर्मचाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घटना महाराष्ट्रासाठी अशोभनीय असल्याचे नमूद केले आहे. शिष्टमंडळात भाविसे जिल्हा संघटक निरज बुटे, उपजिल्हा संघटक अजिंक्य मकेश्वर, जिल्हा सचिव अमर बेलगे, तालुका संघटक शंतनू भोयर, शहर संघटक अमेय देवगडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दृष्यांत ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)