शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

ठेवीदारांच्या न्यायासाठी पावले उचला

By admin | Updated: November 26, 2014 23:11 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात केंद्र शासनाने सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला असता तरी पुढील कार्यवाही काय होत आहे याची कोणतीही माहिती गत

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठेवीदार कृती समितीवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात केंद्र शासनाने सहकारी बँकांना पुनर्जीवित करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला असता तरी पुढील कार्यवाही काय होत आहे याची कोणतीही माहिती गत पंधरा दिवसांपासून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठेविदारांच्या ठेवी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्यशासनाने कठोर पाऊले उचलून कार्यवाही करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किसान अधिकारी अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा ठेवीदार कृती समितीच्या सदस्यांनी निवेदन पाठविले.निवेदनानुसार जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवहार व्यवस्थित व अद्यावत करून ठेविदारांचा पुन:संपादन करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा सहकारी बँकेच्या संदर्भात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रशासक म्हणून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची राज्यशासनाने नियुक्ती करावी, संपूर्ण व्यवहार व अनियमितता नियंत्रणात आणावी, बँकेचा एनपीए व्यवस्थित करण्यासाठी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळातील अध्यक्ष, सदस्य व हमी धारकांना दिलेल्या थकित कर्जाच्या वाटपासाठी नियमानुसार जबाबदार मानून त्यांच्या संपत्ती लिलावात काढण्यात याव्या, बँकेचे कर्ज थकित ठेवणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना व उद्योगांना सक्तीने जप्तीचे आदेश देण्यात यावे, सोबतच बँकेसोबत केलेल्या अनियमितेच्या आधारावर उच्च न्यायालयात संचालक मंडळातील सदस्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवून खटले चालवावे, थकित कर्जदारांची यादी वर्तमान पत्रात जाहीर करावी व कर्जदारांकडे असलेल्या थकित रकमांच्या वसुलीसाठी शासनाची ५० टक्क्यांवरील पैसेवारीची अट शिथिल करून वर्धा जिल्ह्यात सकतीची वसुली करण्याचे आदशे प्रशासकाला राज्य शासनाने द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच डॉ. प्रकाश बक्षी समिती व डॉ. वैद्यनाथन समितीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पुनर्जीवनासाठी दिलेल्या आवश्यक सूचना लवकरात लवकर लागू कराव्या, आवश्यकतेनुसार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत किंवा अन्य सक्षम बँकेत विलिनीकरण करावे आणि या सर्व मुद्यांसंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ठेविदार कृती समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य गोविंद सावरकर, केशव राऊत, गुलाब पारसडे, ज्ञानेश्वर ठाकरे, विनायक तेलरांधे, मारोती तेलरांधे, मंगेश शेंडे, मयूर राऊत, पंकज सत्यकार, बाराहाते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)