शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सकाळच्या सत्रात घ्या; ‘झेडपी’च्या सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:48 IST

पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांची मागणी : पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उकाड्यामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात होणार आहे.शासनाच्या धोरणानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनपासून नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गावांमध्ये आणि शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. वातावरणातील प्रचंड उकाडा, वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी दिवसभर विद्यार्थी बेचैन झाले असून आजारी पडण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.विद्यार्थ्यांचा विचार करुन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लागलीच २८ जूनपासून १३ जुलै २०१९ पर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले. सकाळी ७ वाजतापासून १२ वाजतापर्यंत शाळा घेऊन शाळांचे कामकाज प्रभावित होणार नाही; यासोबतच सध्याची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहे.जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची वेळ सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी १२ वाजतापर्यंत ठरवून देण्यात आली असून सकाळी ७ ते ७.२० पर्यंत प्रार्थना व परिपाठ होईल. त्यानंतर तासिकेला सुरुवात करुन दुपारी १२ वाजता शेवटची ८ वी तासिका होईल.