शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शाळा सकाळच्या सत्रात घ्या; ‘झेडपी’च्या सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:48 IST

पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती.

ठळक मुद्देशिक्षक संघटनांची मागणी : पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि उकाड्यामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात होणार आहे.शासनाच्या धोरणानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनपासून नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गावांमध्ये आणि शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. वातावरणातील प्रचंड उकाडा, वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी दिवसभर विद्यार्थी बेचैन झाले असून आजारी पडण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.विद्यार्थ्यांचा विचार करुन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लागलीच २८ जूनपासून १३ जुलै २०१९ पर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले. सकाळी ७ वाजतापासून १२ वाजतापर्यंत शाळा घेऊन शाळांचे कामकाज प्रभावित होणार नाही; यासोबतच सध्याची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहे.जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची वेळ सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी १२ वाजतापर्यंत ठरवून देण्यात आली असून सकाळी ७ ते ७.२० पर्यंत प्रार्थना व परिपाठ होईल. त्यानंतर तासिकेला सुरुवात करुन दुपारी १२ वाजता शेवटची ८ वी तासिका होईल.