शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांवर तत्काळ कारवाई करा

By admin | Updated: July 4, 2015 00:24 IST

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यांच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करा.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ३० दिवसांत आरोपपत्र सादर करावर्धा : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यांच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही करा. एखाद्या प्रकरणात केवळ न्यायालयात प्रकरण दाखल झाले म्हणून तपास थांबवू नका. ३० दिवसांच्या आत चार्जशीट सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सभेत दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यात दाखल झालेल्या १४ गुन्ह्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, समितीचे सदस्य डॉ. ए.एच. रिझवी, चंद्रशेखर झोड, डॉ. संजय तेलंग, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सदस्य सचिव बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. दाखल होणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रकरणांमध्ये विलंब होतो. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडून तत्काळ जात प्रमाणपत्र देण्याची स्वतंत्र व्यवस्था देण्यात येईल. अशा प्रकरणांचा तपास जलदगतीने करुन न्यायालयात प्रकरण सादर करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येईल. यानंतर पोलीस अधीक्षक गोयल यांनी प्रत्येक प्रकरणाचा जलदगतीने तपास करुन ३० दिवसांत चार्जशीट सादर करण्याचा प्रयत्न करावा. न्यायालयाचा स्थगनादेश असेपर्यंत कोणत्याही प्रकरणाचा तपास थांबवू नका, अशा सूचना केल्या. जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत १४ गुन्हे घडले आहे. यापैकी १३ प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)