शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

पीककर्जाबाबत खबरदारी घ्या

By admin | Updated: May 8, 2016 02:21 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आशुतोष सलिल : शेतकऱ्यांकरिता कर्ज मेळावा वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅँकांनी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्हा प्रशासनाने एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केल्या. वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकास भवन येथील पीक कर्ज मेळावा आयोजित होता. या पहिल्याच मेळाव्यात सुमारे ४०० शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन पीक कर्जाची प्रकरणे विविध बॅँकेच्या अधिकाऱ्यांना सादर केली. यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच पटवाऱ्याने कर्ज प्रकरणांसाठी आवश्यक कागदपत्र कर्ज मेळाव्यातच उपलब्ध करून दिले. देवळी येथे तहसील कार्यालयात आयोजित कर्ज मेळाव्यात ८०० ते ९०० शेतकरी उपस्थित होते. पीक कर्जाबाबतचे प्रस्ताव या कर्ज मेळाव्यात सादर करताना कर्जाचे पुनर्गठन व ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा कर्ज घेतल्याच्या नोंदी नाहीत, अशी सर्व प्रकरणे स्वीकारण्यात आली. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना आवश्यक असलेला सातबारा घरपोच देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सातबारा उपलब्ध झाला नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केल्या. त्यांनी देवळी येथे भेट देत शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांना मिळाला दिलासावर्धेत विकास भवन येथे खरीप पीक कर्जासाठी तसेच पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूकही या मेळाव्यात करण्यात आली. चालू वर्षातील पीक कर्ज परतफेड, सन २०१४-१५ चे पुनर्गठन, २०१५-१६ चे पीक कर्ज आदी बाबतीत शेतकरी नरेंद्र घाडगे, मधुकर पोळ, वासुदेव महाळकर, शशीकांत पोळ, विठ्ठल खेडेकर, विश्वनाथ पाहुणे, भीमराव नाखले, किशोर पाहुणे, योगेश पोळ, संदीप पोळ, गणेश पाहुणे, शशीकांत पोळ, संतोष पाहुणे, नरसिंग भोकरे, किसना किनकर, निलेश किनकर यांनी शंका उपस्थित केल्या. त्यांच्या शंकाचे निरसन जिल्हाधकारी आशुतोष सलील, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा यांनी केले. तालुकास्तरावर निराशादेवळी : येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता असलेल्या पीककर्ज मेळाव्यात बॅँक प्रशासन व शासनात असलेल्या धोरणात्मक अभावामुळे कास्तकारांची निराशा झाली. मेळाव्यात कोणत्याही कास्तकारांना आॅनलाईन सात बारा मिळाला नसल्याने गत वर्षीच्या थकीत कर्जदारांचे पुर्नगठन न करण्याचे काही बॅँकांनी सांगितल्यामुळे कास्तकारांत गोंधळाची स्थिती होती. एकीकडे गत वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यासोबतच हस्तलिखीत सातबारा देणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात कास्तकारांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप होत रोष व्यक्त करण्यात येत आहे. मेळाव्याला भारतीय स्टेट बॅँक, महाराष्ट्र बॅँक, कॅनरा बॅँक, बॅँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅँक, नागरी बॅँक तसेच बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यासोबतच नायब तहसीलदार बाळू भागवत व नायब तहसीलदार एस.व्ही. ढोके यांची उपस्थिती होती. तहसीलदार तेजस्वीनी जाधव रजेवर असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. तालुक्यातील अंदोरी, गिरोली, पुलगाव, देवळी, विजयगोपाल, भिडी व परिसरातील गावातील दीड हजार कास्तकारांना ५ व ६ मे रोजी आॅनलाईन सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी अर्जही सादर केले.