शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खदानीवर कार्यवाही करा

By admin | Updated: August 29, 2016 00:35 IST

महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तहसीलदारांना निवेदन : भटके विमुक्त संघर्ष परिषदेची मागणीदेवळी : महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. असे असताना नियमबाह्य खदानीवर शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या खदान मालकावर कार्यवाही करून परिसरातील सर्व खदानी बंद कराव्या व पारधी समाजातील त्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्यावतीने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदनातून करण्यात आली.आगरगाव पारधी बेड्यावरील नियमबाह्य खदानीतील खोलवर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन शाळकरी मुलींचा करुण अंत झाला होता. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासनस्तरावर कोणत्याही हालचाली न झाल्याने समाजमनात रोष व्यक्त होत आहे. या परिसरात पारधी बेडा मागील २० ते २५ वर्षांपासून कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. असे असताना लोकवस्तीपासून ३० फुट अंतरावर खदानीला परवानगी कशी काय देण्यात आली, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खदानीतून दगड व मुरूम काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यांना इतर साहित्याने पूर्ववत भरण्याचा नियम आहे; पण या सर्व नियमांना फाटा देऊन पारधी वस्ती परिसरात खोलवर खड्डे खोदण्यात आले. मागील सात वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. या सर्व व्यवहारात खदान मालकाने लाखोचा मलिदा घशात घातला आहे. शासन स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांची भूमिकाही याबाबत संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, नियमबाह्य खदान मालकावर कार्यवाही करण्यात यावी, विकासापासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजातील कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तहसीलदार जाधव यांना भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे संयोजक किरण पारिसे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.(प्रतिनिधी)