शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

‘त्या’ खदानीवर कार्यवाही करा

By admin | Updated: August 29, 2016 00:35 IST

महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तहसीलदारांना निवेदन : भटके विमुक्त संघर्ष परिषदेची मागणीदेवळी : महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. असे असताना नियमबाह्य खदानीवर शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या खदान मालकावर कार्यवाही करून परिसरातील सर्व खदानी बंद कराव्या व पारधी समाजातील त्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्यावतीने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदनातून करण्यात आली.आगरगाव पारधी बेड्यावरील नियमबाह्य खदानीतील खोलवर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन शाळकरी मुलींचा करुण अंत झाला होता. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासनस्तरावर कोणत्याही हालचाली न झाल्याने समाजमनात रोष व्यक्त होत आहे. या परिसरात पारधी बेडा मागील २० ते २५ वर्षांपासून कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. असे असताना लोकवस्तीपासून ३० फुट अंतरावर खदानीला परवानगी कशी काय देण्यात आली, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खदानीतून दगड व मुरूम काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यांना इतर साहित्याने पूर्ववत भरण्याचा नियम आहे; पण या सर्व नियमांना फाटा देऊन पारधी वस्ती परिसरात खोलवर खड्डे खोदण्यात आले. मागील सात वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. या सर्व व्यवहारात खदान मालकाने लाखोचा मलिदा घशात घातला आहे. शासन स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांची भूमिकाही याबाबत संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, नियमबाह्य खदान मालकावर कार्यवाही करण्यात यावी, विकासापासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजातील कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तहसीलदार जाधव यांना भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे संयोजक किरण पारिसे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.(प्रतिनिधी)