शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

‘त्या’ खदानीवर कार्यवाही करा

By admin | Updated: August 29, 2016 00:35 IST

महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तहसीलदारांना निवेदन : भटके विमुक्त संघर्ष परिषदेची मागणीदेवळी : महिनाभरापूर्वी आगरगाव येथील पारधी बेड्यावरील तीन शाळकरी मुलींचा खदानीतील खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. असे असताना नियमबाह्य खदानीवर शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या खदान मालकावर कार्यवाही करून परिसरातील सर्व खदानी बंद कराव्या व पारधी समाजातील त्या कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्यावतीने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदनातून करण्यात आली.आगरगाव पारधी बेड्यावरील नियमबाह्य खदानीतील खोलवर पाण्याचा अंदाज न आल्याने तीन शाळकरी मुलींचा करुण अंत झाला होता. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही शासनस्तरावर कोणत्याही हालचाली न झाल्याने समाजमनात रोष व्यक्त होत आहे. या परिसरात पारधी बेडा मागील २० ते २५ वर्षांपासून कायमस्वरूपी वास्तव्यास आहे. असे असताना लोकवस्तीपासून ३० फुट अंतरावर खदानीला परवानगी कशी काय देण्यात आली, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खदानीतून दगड व मुरूम काढल्यानंतर पडलेल्या खड्ड्यांना इतर साहित्याने पूर्ववत भरण्याचा नियम आहे; पण या सर्व नियमांना फाटा देऊन पारधी वस्ती परिसरात खोलवर खड्डे खोदण्यात आले. मागील सात वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. या सर्व व्यवहारात खदान मालकाने लाखोचा मलिदा घशात घातला आहे. शासन स्तरावरील महसूल अधिकाऱ्यांची भूमिकाही याबाबत संशयास्पद आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, नियमबाह्य खदान मालकावर कार्यवाही करण्यात यावी, विकासापासून कोसो दूर असलेल्या पारधी समाजातील कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तहसीलदार जाधव यांना भटके विमुक्त संघर्ष परिषदेचे संयोजक किरण पारिसे यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.(प्रतिनिधी)