शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जलसंकटाची दाहकता लक्षात घेऊन उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:29 IST

मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : पाणी टंचाईवर आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील जलसंकटाची भविष्यातील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तातडीने उपाय योजना करण्यात करण्यात याव्या, अशा सुचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.वर्धा पं.स.च्या सभागृहात सोमवारी वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सभापती जयश्री गफाट, सुकेशीनी धनविज, संजय शिंदे, सरस्वती मडावी, राऊत, पं.स. सदस्य अमित गावंडे, महेश आगे, तहसीलदार मनोहर चव्हाण, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. मागील बैठकीचा आढावा घेत कोणती कामे घेण्यात आली याची माहिती घेऊन अनेक कामे का अपूर्ण राहली याबाबतची विचारणा याप्रसंगी आ. भोयर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. गणेशपूर, महाकाळ, साटोडा, वरुड, नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव (मेघे)े, सालोड, नटाला, नेरी पुनर्वसन, पालोती, कुरझडी या गावात प्रत्यक्षात सुरू असलेल्या योजना, बंद पडलेल्या योजनांची माहिती घेऊन नवीन उपाययोजना बद्दल जि.प., पं.स. सदस्य व सरपंच यांचे म्हणणे जाणून घेऊन तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश याप्रसंगी देण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या; पण त्यांना मोबदला देण्यात आला नसल्याचे काही सदस्यांनी लक्षात आणून दिल्यावर याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचविण्यात आले. नटाला व नेरी पुनर्वसन या गावांचा बैठकीच्या यादीत समावेश नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत ही नावे का सुटली याची चौकशी करण्याचे आदेशही यावेळी निर्गमित करण्यात आले. लोकसंख्येच्या आधारे पाणी टंचाईचा आराखडा करण्यात यावा, लोकसंख्येची जुनी आकडेवारी ग्राह्य धरू नये, आकड्यांच्या खेळामुळे नागरिक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्यक्ष काम कसे करता येईल या दृष्टीने नियोजन करण्याचे सांगण्यात आले. साटोडा येथील विहिरीचा गाळ उपसण्याचा विषया यावेळी चर्चीला गेला. बोरगावच्या तलावाचे खोलीकरण, रोठा तलावाचे पाणी सोडणे, गणेशपूर-पांढरकवडा येथील योजनेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी देण्यात आल्या.