शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलसंकटाची दाहकता लक्षात घेऊन उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:29 IST

मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : पाणी टंचाईवर आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून पाऊस सरासरी पेक्षा कमी झाला. यावर्षी अनियमित पावसामुळे धरणांमध्ये जलसंचय कमी झाले आहे. नदी-नाल्या मधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. शिवाय भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील जलसंकटाची भविष्यातील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून तातडीने उपाय योजना करण्यात करण्यात याव्या, अशा सुचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.वर्धा पं.स.च्या सभागृहात सोमवारी वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सभापती जयश्री गफाट, सुकेशीनी धनविज, संजय शिंदे, सरस्वती मडावी, राऊत, पं.स. सदस्य अमित गावंडे, महेश आगे, तहसीलदार मनोहर चव्हाण, संजय पाटील आदींची उपस्थिती होती. मागील बैठकीचा आढावा घेत कोणती कामे घेण्यात आली याची माहिती घेऊन अनेक कामे का अपूर्ण राहली याबाबतची विचारणा याप्रसंगी आ. भोयर यांनी अधिकाऱ्यांकडे केली. गणेशपूर, महाकाळ, साटोडा, वरुड, नालवाडी, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव (मेघे)े, सालोड, नटाला, नेरी पुनर्वसन, पालोती, कुरझडी या गावात प्रत्यक्षात सुरू असलेल्या योजना, बंद पडलेल्या योजनांची माहिती घेऊन नवीन उपाययोजना बद्दल जि.प., पं.स. सदस्य व सरपंच यांचे म्हणणे जाणून घेऊन तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश याप्रसंगी देण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या; पण त्यांना मोबदला देण्यात आला नसल्याचे काही सदस्यांनी लक्षात आणून दिल्यावर याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचविण्यात आले. नटाला व नेरी पुनर्वसन या गावांचा बैठकीच्या यादीत समावेश नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत ही नावे का सुटली याची चौकशी करण्याचे आदेशही यावेळी निर्गमित करण्यात आले. लोकसंख्येच्या आधारे पाणी टंचाईचा आराखडा करण्यात यावा, लोकसंख्येची जुनी आकडेवारी ग्राह्य धरू नये, आकड्यांच्या खेळामुळे नागरिक सरकारी योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्यक्ष काम कसे करता येईल या दृष्टीने नियोजन करण्याचे सांगण्यात आले. साटोडा येथील विहिरीचा गाळ उपसण्याचा विषया यावेळी चर्चीला गेला. बोरगावच्या तलावाचे खोलीकरण, रोठा तलावाचे पाणी सोडणे, गणेशपूर-पांढरकवडा येथील योजनेची पाहणी करून प्रस्ताव सादर करण्याची सूचना यावेळी देण्यात आल्या.