शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: April 18, 2016 04:32 IST

रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला.

वर्धा : रामनवमीच्या शोभायात्रेत डीजे लावण्याच्या कारणावरून पोलिसांकडून सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई द्वेषपूर्ण असल्याचा आरोप करीत लाठीहल्ला करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विश्वहिंदू परिषदेच्यावतीने रविवारी पत्रकार परिषदेतून केली. वर्धा शहरात विविध भागातून रामनवमी शोभायात्रा काढण्यात आली. यात शास्त्री चौक परिसरातील शोभायात्रा सोशालीस्ट चौकाकडे जाण्याकरिता निघाली असता वेळेचे कारण काढून पोलिसांनी यात सहभागी नागरिकांवर लाठीहल्ला केला. पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी वंजारी चौक परिसरात सुरू असलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात जेवण करीत असलेल्यांना मारहाण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वास्तविकतेत रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने शांतता बैठकीत उन्हाच्या कारणारने मिरवणुकीला एक तासाच्या अधिक अवधीची मागणी केली होती. ती प्रशासनाच्यावतीने मान्य करण्यात आली होती. असे असताना पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारवाईकरिता न्यायालयात जाणार ४या लाठीहल्ला प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास पोलीस विभागाकडून दुर्लक्ष झाल्यास विश्व हिंदू परिषद न्यायालयात जाणार असल्याची माहिती यावेळी प्रशांत बुरले यांनी दिली. येथून आदेश आणत या प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. चार्ली पथकावर वचक आवश्यक ४शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने चार्ली पथक तयार करण्यात आले. मात्र या चार्ली पथकाचा लाभ होण्याऐवजी त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे. हे पथक आपले कार्यक्षेत्र सोडून काम करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पथकावर पोलीस विभागाने वचक बसवावा, अन्यथा त्यांना नागरिकांकडून चोप मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे न.प. उपाध्यक्ष कुलधरीया म्हणाले.