शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढून भूखंड वाटपाची कारवाई करा

By admin | Updated: October 26, 2016 01:02 IST

तालुक्यातील भाईपूर येथील भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांना भूखंड वाटपाची कारवाई करावी,

सदस्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला साकडेआर्वी : तालुक्यातील भाईपूर येथील भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांना भूखंड वाटपाची कारवाई करावी, अशी मागणी जि.प. सदस्य गजानन गावंडे यांनी केली आहे. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सभेतही मुद्दा लावून धरला होता. तालुक्यातील वाठोडा व बोरगाव (हातला) येथील प्रकल्पग्रस्तांनी भाईपूर, बोरगाव (नांदोरा) पुनर्वतिस गावठाणामध्ये भूखंड शिल्लक आहे. ते बांधकामास योग्य नसल्याने पुनर्वसित गावठाण वागदा येथे भूखंड मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. त्यानुसार बोरगाव येथील नागरिकांना वागदा येथील मंजूर नसलेल्या ले-आऊमध्ये भूखंड वाटप करण्यात आले होते; पण वाठोडा, भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड कमी पडत असल्याने वाटप करण्यात आले नव्हते. यानंतर वागदा पुनर्वसन गावठाणातील शिल्लक जागेची मागणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नगर रचनाकारांकडे त्यावर भूखंड पाडून देण्याबाबत प्रस्ताव पाठविला. नगर रचनाकारांनी त्या प्रस्तावास मंजुरी दिली. यानंतर भूखंड पाडण्याकरिता पत्र देण्यात आले; पण अद्याप तेथे भूखंड पाडण्यात आले नाहीत. तेथे अतिक्रमण झाल्याने भूखंड निर्मितीत अडचणी येत आहे. हे अतिक्रमण हटवून भाईपूर येथील अर्जदारांना भूखंड वाटप करावे, अशी मागणी जि.प. सदस्य गावंडे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभेमध्येही प्रश्न लावून धरला आहे.(तालुका प्रतिनिधी)