शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

तहसीलदारांना कोंडताच कामांना गती

By admin | Updated: May 12, 2016 02:19 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते.

शेतकऱ्यांचे आंदोलन : तीन वर्षांपासून प्रलंबित विहीर दुरूस्ती प्रक्रियेला वेगआर्वी : रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. बुधवारी शेतकरी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी आंदोलन करीत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना त्यांच्या कक्षात कोंडून ठेवले. या आंदोलनाचा धसका घेत गुरुवारपासून मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरींचे अंदाज -पत्रक तयार करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी अनुदानही जाहीर करण्यात आले. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयाने २०१३ मध्येच तयार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पाठविली; पण त्यांनी अभियंता नसल्याने विहीर दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे शक्य नसल्याचे कारण देत काम ठप्प ठेवले. शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पंचायत समितीकडे १८ मोर्च रोजी सोपविले; पण पंचायत समितीच्या अभियंत्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. याचा फटका शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला बसला. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्याकडे समस्या मांडल्या. यावरून जगताप यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयातील कक्ष गाठला. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना कक्षातच कोंडून ठेवले. जोपर्यंत अंदाज पत्रकाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत कक्ष सोहणार नाही, असा निर्धार जाहीर करण्यात आला. परिणामी, तहसीलदार मस्के यांनी पं.स. गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, अभियंता दौलतकर, तालुका कृषी अधिकारी खेडकर यांना बोलवून चर्चा केली. तीन अभियंत्याचे सहकार्य घेत गुरुवारपासून कामाला सुरुवात करून चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करून देण्याची ग्वाही दिली. या आंदोलनामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित समस्या मार्गी लागली. आंदोलनात भाजप शहर उपाध्यक्ष सुधीर जाचक यांच्यासह सुरज राठोड, परसराम राठोड, अंबादास लक्षणे, मारोती साठे, धनंजय महाजन, नरेश चव्हाण, कुवरसिंग राठोड, युवराज चव्हाण, रामदास जाधव, कैलास अवथळे, प्रफूल वाळके, भास्कर जाधव, राजू आगरकर, संतोष गौरकार, विक्रम भगत आदींनी सहभाग घेतला.(तालुका/शहर प्रतिनिधी)चार दिवसांत होईल अंदाजपत्रक तयार२०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींची दुरूस्ती करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्याप प्रक्रियाच पूढे सरकली नव्हती. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांनाच त्यांच्या कक्षात कोंडले. परिणामी, चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली.