शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बोर व्याघ्रात वाघांची संख्या रोडावल्याने ताडोब्यातील ‘टायगर’ करताहेत एन्ट्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. जंगलाची सलगता असे वैशिष्ट्य असलेल्या या वाघांसाठी संरक्षित असलेल्या विस्तीर्ण परिसरात सध्या एकूण सहा प्रौढ वाघ-वाघिणींचे वास्तव्य आहे. यात चार वाघिणींचा तर बीटीआर-८ आणि बीटीआर-१० या दोन वाघांचा समावेश आहे. तर याच व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

विदर्भ देशाची व्याघ्र राजधानीच-    विदर्भात एकूण पाच व्याघ्र प्रकल्प असून ३०० चौ. कि.मी. चे परिक्षेत्र वाघांच्या वास्तव्यासाठी राखीव आहे. या आरक्षित जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघ असल्याने विदर्भ सध्या देशाची व्याघ्र राजधानीच ठरत आहे. विदर्भात ३०० हून अधिक वाघ आहेत.

वनपरिक्षेत्रात सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू-    वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या वनपरिक्षेत्रात मागील सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू झाला. या दोन वाघांपैकी एकाचा नैसर्गिक तर दुसऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. -    २५ ऑगस्ट २०१३ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मदना शिवारात वाघाचा तर १४ ऑक्टोबर २०१७ ला कारंजा वनपरिक्षेत्रात शेत सर्व्हे क्रमांक ७६/१ मध्ये वाघिणीचा मृतदेह सापडला होता.

जंगलाची सलगता -    जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.कि.मी. तर नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी. तसेच नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी. आहे. जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचेच ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

२०१८ मध्ये वर्ध्यात आला होता ताडोब्यातील वाघ-   चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक अडीच वर्षीय तरुण वाघ नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वरोरा मार्ग वर्धा जिल्ह्यातील देवळीपर्यंत येत तो सुमारे ५०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातील बैतुलच्या जंगलात गेला. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा वाघ वर्धा जिल्ह्यात आल्यावर त्याने वर्धा जिल्ह्यात मनुष्यावर हल्ला केला नाही. पण अमरावती जिल्ह्यात त्याने मनुष्याला ठार केले होते.

‘पुष्पा’ १९ मार्चपासून वनविभागाला गवसेना

-    नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत आलेल्या अडीच ते तीन वर्षे वयोगटातील वाघ आंजी (मोठी) पर्यंत जात पुन्हा पवनार शिवारात परतला. पण हाच वाघ १९ मार्चपासून वनविभागाला गवसलेला नाही. या वाघाच्या मागावर असलेले वन्यजीव प्रेमी त्याला लाडाने ‘पुष्पा’ संबोधित असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

टॅग्स :TigerवाघBor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प