शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बोर व्याघ्रात वाघांची संख्या रोडावल्याने ताडोब्यातील ‘टायगर’ करताहेत एन्ट्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. जंगलाची सलगता असे वैशिष्ट्य असलेल्या या वाघांसाठी संरक्षित असलेल्या विस्तीर्ण परिसरात सध्या एकूण सहा प्रौढ वाघ-वाघिणींचे वास्तव्य आहे. यात चार वाघिणींचा तर बीटीआर-८ आणि बीटीआर-१० या दोन वाघांचा समावेश आहे. तर याच व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.

विदर्भ देशाची व्याघ्र राजधानीच-    विदर्भात एकूण पाच व्याघ्र प्रकल्प असून ३०० चौ. कि.मी. चे परिक्षेत्र वाघांच्या वास्तव्यासाठी राखीव आहे. या आरक्षित जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघ असल्याने विदर्भ सध्या देशाची व्याघ्र राजधानीच ठरत आहे. विदर्भात ३०० हून अधिक वाघ आहेत.

वनपरिक्षेत्रात सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू-    वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या वनपरिक्षेत्रात मागील सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू झाला. या दोन वाघांपैकी एकाचा नैसर्गिक तर दुसऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. -    २५ ऑगस्ट २०१३ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मदना शिवारात वाघाचा तर १४ ऑक्टोबर २०१७ ला कारंजा वनपरिक्षेत्रात शेत सर्व्हे क्रमांक ७६/१ मध्ये वाघिणीचा मृतदेह सापडला होता.

जंगलाची सलगता -    जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.कि.मी. तर नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी. तसेच नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी. आहे. जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचेच ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

२०१८ मध्ये वर्ध्यात आला होता ताडोब्यातील वाघ-   चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक अडीच वर्षीय तरुण वाघ नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वरोरा मार्ग वर्धा जिल्ह्यातील देवळीपर्यंत येत तो सुमारे ५०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातील बैतुलच्या जंगलात गेला. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा वाघ वर्धा जिल्ह्यात आल्यावर त्याने वर्धा जिल्ह्यात मनुष्यावर हल्ला केला नाही. पण अमरावती जिल्ह्यात त्याने मनुष्याला ठार केले होते.

‘पुष्पा’ १९ मार्चपासून वनविभागाला गवसेना

-    नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत आलेल्या अडीच ते तीन वर्षे वयोगटातील वाघ आंजी (मोठी) पर्यंत जात पुन्हा पवनार शिवारात परतला. पण हाच वाघ १९ मार्चपासून वनविभागाला गवसलेला नाही. या वाघाच्या मागावर असलेले वन्यजीव प्रेमी त्याला लाडाने ‘पुष्पा’ संबोधित असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

टॅग्स :TigerवाघBor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्प