शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापनाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:41 IST

स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे३४ एकर जमिनीवर तयार होतोय खत कारखाना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मात्र, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या विषय मार्गी लावण्याकडे होत असलेले दुर्लक्ष न.प.च्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारेच ठरत आहे. नजीकच्या इंझापूर येथे सुमारे ३४ एकर जमिनीवर न.प. प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा कारखाना तयार होणार आहे. पण, सध्यास्थितीत तेही काम कासवगतीनेच होत असल्याचे दिसून येते.घराघरातून कचरा गोळा करून तो एकाजागी साठवून त्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी एका खासगी कंपनीला न.प. प्रशासनाने कंत्राट दिला आहे. १ आॅक्टोबर पासून सदर कंत्राटदार आपले काम सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्यापही दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ व सुंदर वर्धा शहर या उद्देशाने न.प. प्रशासनाने खरेदी केले विविध साहित्य सध्या न.प.च्या निर्माणाधिन इमारतीच्या आवारात धुळखात आहे. तर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या ओला व सुका अशा वेगवेळ्या अनेक कचरापेट्या अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान तोडण्यात आले आहे. तर ज्या कचरापेट्या कायम आहेत. त्यात काही सुजान नागरिक घरातील व व्यावसायिक प्रतिष्ठानातील कचरा टाकत असल्याचे दिसून येते. अनेक कचरा पेट्या जलवाहीनीच्या कामादरम्यान तोडण्यात आल्याने न.प.चा त्यावर खर्च झालेला निधी वाया गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यामुळे न.प. प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.ट्रॅक्टर जेसीबी व नवीन ट्रॅक्टर ठरत आहे मदतगारशहरातील विविध भागातील कचºयाचे ढिगारे न.प. प्रशासानाचा स्वच्छता विभाग ट्रॅक्टर जेसीबीच्या सहाय्याने उचलून तो ट्रॅक्टर ट्रॉलीत लादून नियोजित ठिकाणी नेत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय नव्याने खरेदी केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली कचरा व्यवस्थापनासाठी न.प.ला मदतगार ठरत असल्याचेही सांगण्यात आले.काही ‘नम्मा’ झाले सुरूस्वच्छ वर्धा या उद्देशाने न.प. प्रशासनाने नम्मा टॉयलेटची खरेदी केली. बजाज चौक, वर्धा रेल्वे स्थानक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नम्मा टॉयलेट लावण्यात आले. परंतु, सुरूवातीला काम पूर्ण होऊनही त्याच्या लोकार्पणासाठी मुहूर्त न.प.ला सापडत नव्हता. त्याबाबतचे वृत्त लोकमतने ‘ नम्माच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडे ना’ या मथळ्याखाली २ जुलैला प्रकाशित करताच काही नम्मा टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले. एकूण पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे न.प.च्या निश्चित केले आहे हे विशेष.