शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:41 IST

नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी अडकला ‘विकास’ : १.१० कोटीऐवजी ३७.५० लाख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.न.प. निवडणूक काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. वर्धेकरांनी ते ग्राह्य धरत भाजपाला सत्ता दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी विकास कामांना प्रारंभही केला; पण याला पक्षच साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शहर विकासासाठी आजपर्यंत १०० कोटींच्या वर निधी उपलब्ध करून दिला; पण तो बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला. यामुळे न.प. च्या तिजोरीत ठणठणाटच दिसतो. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी गरजेचे असताना अद्याप निधीच देण्यात आला नाही. जलतरण तलावाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी अपेक्षित आहे; पण पालिकेला केवळ ३७.५० लाख रुपये मिळालेत. यामुळे जलतरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. निधीच मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.उपहारगृह आणि उद्यानाचा प्रस्ताव रद्दजलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. यात ६० लाख रुपयाचे चार फिल्टर प्लाँट लावलेत. यातील दोन सुरु असताना दोन ‘स्टँड बाय’ असणार आहे. येथे स्प्रींग डायव्हींग, महिलांकरिता चेंजींग रूम व वॉश रूम तसेच टँकरच्या टाईल्स व वॉटर प्रुफींग करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून पालिकेला ३७.५० लाख रुपयेच मिळाले आहेत. यामुळे उर्वरित काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. जलतरण तलावालगत मोकळ्या जागेवर उद्यान व उपहारगृह उभारणे प्रस्तावित होते; पण निधीच नसल्याने ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.निधीची आशा धूसरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० कोटी व जलतरण तलाव नूतनीकरणास १ कोटींची गरज आहे. हा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची अपेक्षा होती; पण तरतूदच करण्यात आली नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट राहणार आहेत. पूढील वर्षीच्या अर्थसंकल्पाची शाश्वती नाही. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. मग, ही कामेही अर्धवटच तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.