शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:41 IST

नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी अडकला ‘विकास’ : १.१० कोटीऐवजी ३७.५० लाख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.न.प. निवडणूक काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. वर्धेकरांनी ते ग्राह्य धरत भाजपाला सत्ता दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी विकास कामांना प्रारंभही केला; पण याला पक्षच साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शहर विकासासाठी आजपर्यंत १०० कोटींच्या वर निधी उपलब्ध करून दिला; पण तो बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला. यामुळे न.प. च्या तिजोरीत ठणठणाटच दिसतो. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी गरजेचे असताना अद्याप निधीच देण्यात आला नाही. जलतरण तलावाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी अपेक्षित आहे; पण पालिकेला केवळ ३७.५० लाख रुपये मिळालेत. यामुळे जलतरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. निधीच मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.उपहारगृह आणि उद्यानाचा प्रस्ताव रद्दजलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. यात ६० लाख रुपयाचे चार फिल्टर प्लाँट लावलेत. यातील दोन सुरु असताना दोन ‘स्टँड बाय’ असणार आहे. येथे स्प्रींग डायव्हींग, महिलांकरिता चेंजींग रूम व वॉश रूम तसेच टँकरच्या टाईल्स व वॉटर प्रुफींग करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून पालिकेला ३७.५० लाख रुपयेच मिळाले आहेत. यामुळे उर्वरित काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. जलतरण तलावालगत मोकळ्या जागेवर उद्यान व उपहारगृह उभारणे प्रस्तावित होते; पण निधीच नसल्याने ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.निधीची आशा धूसरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० कोटी व जलतरण तलाव नूतनीकरणास १ कोटींची गरज आहे. हा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची अपेक्षा होती; पण तरतूदच करण्यात आली नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट राहणार आहेत. पूढील वर्षीच्या अर्थसंकल्पाची शाश्वती नाही. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. मग, ही कामेही अर्धवटच तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.