शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:41 IST

नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी अडकला ‘विकास’ : १.१० कोटीऐवजी ३७.५० लाख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.न.प. निवडणूक काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. वर्धेकरांनी ते ग्राह्य धरत भाजपाला सत्ता दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी विकास कामांना प्रारंभही केला; पण याला पक्षच साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शहर विकासासाठी आजपर्यंत १०० कोटींच्या वर निधी उपलब्ध करून दिला; पण तो बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला. यामुळे न.प. च्या तिजोरीत ठणठणाटच दिसतो. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी गरजेचे असताना अद्याप निधीच देण्यात आला नाही. जलतरण तलावाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी अपेक्षित आहे; पण पालिकेला केवळ ३७.५० लाख रुपये मिळालेत. यामुळे जलतरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. निधीच मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.उपहारगृह आणि उद्यानाचा प्रस्ताव रद्दजलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. यात ६० लाख रुपयाचे चार फिल्टर प्लाँट लावलेत. यातील दोन सुरु असताना दोन ‘स्टँड बाय’ असणार आहे. येथे स्प्रींग डायव्हींग, महिलांकरिता चेंजींग रूम व वॉश रूम तसेच टँकरच्या टाईल्स व वॉटर प्रुफींग करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून पालिकेला ३७.५० लाख रुपयेच मिळाले आहेत. यामुळे उर्वरित काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. जलतरण तलावालगत मोकळ्या जागेवर उद्यान व उपहारगृह उभारणे प्रस्तावित होते; पण निधीच नसल्याने ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.निधीची आशा धूसरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० कोटी व जलतरण तलाव नूतनीकरणास १ कोटींची गरज आहे. हा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची अपेक्षा होती; पण तरतूदच करण्यात आली नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट राहणार आहेत. पूढील वर्षीच्या अर्थसंकल्पाची शाश्वती नाही. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. मग, ही कामेही अर्धवटच तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.