शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

स्वाभिमान शेतकरी संघटनेची स्वबळावरच तयारी; राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:13 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या सात जागा लढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. विदर्भ कार्यकारिणीच्या बैठकीसाठी वर्धा येथे आले असताना खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले. एनडीए सोबतचे संबंध आपण तोडले असून गेल्यावेळी एनडीएला कार्यक्रमावर आधारीत पाठींबा देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता स्वाभिमान शेतकरी संघटना एनडीए व इतर विरोधी पक्षांपासून अंतर राखून काम करीत आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविली जाणार आहे. राज्यात सात जागांवर स्वाभिमान शेतकरी संघटना आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये लोकसभेच्या कोल्हापूर, हातकंगणे, माढा, सांगली, बुलढाणा, वर्धा, नंदूरबार या जागांचा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.केंद्रीय कृषी मुल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देण्यात यावी ही प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे व दीडपट हमी भाव देण्यात यावा,यासाठी आपण खासगी विधेयक लोकसभेत मांडले आहे. देशातील २३ पक्षांनी या विधेयकाला पाठींबा दिला आहे. हे विधेयक सरकारकडून मांडले गेले पाहिजे अशी आपली मागणी आहे. याला इतरही राजकीय पक्षांनी पाठींबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकऱ्याला चळवळीचा आधार देण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना आता सक्रीय झाली असून येत्या आॅक्टोबर महिन्यात कापूस, मुंग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या भावासाठी वर्धेतून आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

हमीभावाचे थोतांडच; व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने घातले शेपूटदीडपट हमीभावाची घोषणा करण्यात आली असली तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मुंगाला ६ हजार ९७५ हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या ४ हजार ३०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे. तसेच उडीदाला ५ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये दिले जात आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन २० लाख टनापेक्षा कमी झाले होते. त्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु व्यापाऱ्यांशी संगणमत करून सरकारने भाव पाडले. त्यामुळे १ हजार १०० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीन विकावे लागले. असे खासदार शेट्टी सांगितले. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीत सोडून सरकार पसार झाले असा आरोपही त्यांनी केला.

उच्च तंत्रज्ञानाला विरोध नाही मात्र भरपाईची हमी हवीस्वाभिमान शेतकरी संघटनेने शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाला कधीही विरोध केला नाही. भारतीय शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलेच पाहिजे अशी आपली भूमिका आहे. मात्र विदर्भात बोंडअळीने कपाशी पिकाचे नुकसान झाल्यावर कुठल्याही कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. उच्च तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. असेही खासदार शेट्टी म्हणाले. स्वाभिमानच्या आंदोलनानंतर काही भागात कृषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रवीकांत तुपकर, प्रा.डॉ. प्रकाश पोकळे, रवी पडोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी