शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

स्वाभिमान शेतकरी संघटनेची स्वबळावरच तयारी; राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 15:13 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्देलोकसभेच्या सात जागा लढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासोबत युती असलेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. विदर्भ कार्यकारिणीच्या बैठकीसाठी वर्धा येथे आले असताना खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे संकेत दिले. एनडीए सोबतचे संबंध आपण तोडले असून गेल्यावेळी एनडीएला कार्यक्रमावर आधारीत पाठींबा देण्यात आला होता. मात्र शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता स्वाभिमान शेतकरी संघटना एनडीए व इतर विरोधी पक्षांपासून अंतर राखून काम करीत आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविली जाणार आहे. राज्यात सात जागांवर स्वाभिमान शेतकरी संघटना आपले उमेदवार उभे करणार आहे. यामध्ये लोकसभेच्या कोल्हापूर, हातकंगणे, माढा, सांगली, बुलढाणा, वर्धा, नंदूरबार या जागांचा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.केंद्रीय कृषी मुल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देण्यात यावी ही प्रमुख मागणी असून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात यावे व दीडपट हमी भाव देण्यात यावा,यासाठी आपण खासगी विधेयक लोकसभेत मांडले आहे. देशातील २३ पक्षांनी या विधेयकाला पाठींबा दिला आहे. हे विधेयक सरकारकडून मांडले गेले पाहिजे अशी आपली मागणी आहे. याला इतरही राजकीय पक्षांनी पाठींबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. विदर्भातील शेतकऱ्याला चळवळीचा आधार देण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटना आता सक्रीय झाली असून येत्या आॅक्टोबर महिन्यात कापूस, मुंग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या भावासाठी वर्धेतून आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

हमीभावाचे थोतांडच; व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने घातले शेपूटदीडपट हमीभावाची घोषणा करण्यात आली असली तरी ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मुंगाला ६ हजार ९७५ हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या ४ हजार ३०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे. तसेच उडीदाला ५ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये दिले जात आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे उत्पादन २० लाख टनापेक्षा कमी झाले होते. त्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु व्यापाऱ्यांशी संगणमत करून सरकारने भाव पाडले. त्यामुळे १ हजार १०० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीन विकावे लागले. असे खासदार शेट्टी सांगितले. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीत सोडून सरकार पसार झाले असा आरोपही त्यांनी केला.

उच्च तंत्रज्ञानाला विरोध नाही मात्र भरपाईची हमी हवीस्वाभिमान शेतकरी संघटनेने शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाला कधीही विरोध केला नाही. भारतीय शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचलेच पाहिजे अशी आपली भूमिका आहे. मात्र विदर्भात बोंडअळीने कपाशी पिकाचे नुकसान झाल्यावर कुठल्याही कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. उच्च तंत्रज्ञानाचे बियाणे वापरले तर त्याच्या नुकसानीची जबाबदारी फिक्स झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. असेही खासदार शेट्टी म्हणाले. स्वाभिमानच्या आंदोलनानंतर काही भागात कृषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, रवीकांत तुपकर, प्रा.डॉ. प्रकाश पोकळे, रवी पडोळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी