शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 11, 2017 01:20 IST

सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात.

उकाड्यात भर : भारनियमनाचे वेळापत्रक आवश्यकपुलगाव : सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरात काढले आहे. मात्र काही दिवसांपासून वीज वितरणकडून वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. त्यामुळे शहर वासियांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे.शासन कोणतेही असले तरी भारनियमनातून मुक्तता होत नसल्याचा प्रत्यय आजवर नागरिकांना आला आहे. निवडणूक काळात केलेली घोषणा हवेतच विरते. काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर विद्युत विभागाने वीजगळती कमी करुन विजेची बचत केल्यास्तव शहरातील भारनियमन कमी केले होते. त्यामुळे शहरवासियांना काहीकाळ दिलासा मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून वेळीअवेळी आणि तासन्तास वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. रखरखत्यात उन्हापासून जीव वाचविण्यासाठी नागरिक कुलरच्या हवेत आराम करण्याचा बेत आखतात. मात्र वीज पुरवठा खंडित केल्या जात असल्याने नागरिकांना ऐन उन्हाच्या वेळेत उकाडा सहन करावा लागतो. यात भरीसभर म्हणून सायंकाळच्या वेळी वीज पुरवठा खडित करण्यात येत आहे. सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात तर भारनियमन अधिक वेळेकरिता केले जाते. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. शेतमालास योग्य प्रमाणात पाणी देता येत नसल्याचे भाजीपाला व उन्हाळी पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. वेळापत्रकानुसार भारनियमन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एकीकडे शासन कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पीक कसे जगवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅकेचे कर्ज काढुन पेरणी केल्यावर पाण्याअभावी उभे पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात लोटण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.रखरखत्या उन्हातही खंडित होत असलेला वीज पुरवठ्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. ठराविक वेळेत भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी आहे. वीज वितरण लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)पाणी पुरवठा होतो प्रभावीतसकाळी होणाऱ्या भारनियमानामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहे. उत्पादन चांगले या आशेवर शेतकरी असतानाच वेळीअवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्याव लागते आहे. आणिी असताना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक वाळत आहे.