शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 11, 2017 01:20 IST

सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात.

उकाड्यात भर : भारनियमनाचे वेळापत्रक आवश्यकपुलगाव : सूर्य दिवसभर आग ओकत असल्याने सतत उष्णतामानात वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडलेले दिसतात. या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरात काढले आहे. मात्र काही दिवसांपासून वीज वितरणकडून वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. त्यामुळे शहर वासियांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे.शासन कोणतेही असले तरी भारनियमनातून मुक्तता होत नसल्याचा प्रत्यय आजवर नागरिकांना आला आहे. निवडणूक काळात केलेली घोषणा हवेतच विरते. काही वर्षांपूर्वी स्थानिक पातळीवर विद्युत विभागाने वीजगळती कमी करुन विजेची बचत केल्यास्तव शहरातील भारनियमन कमी केले होते. त्यामुळे शहरवासियांना काहीकाळ दिलासा मिळाला होता. परंतु मागील काही दिवसांपासून वेळीअवेळी आणि तासन्तास वीज पुरवठा खंडित केल्या जात आहे. रखरखत्यात उन्हापासून जीव वाचविण्यासाठी नागरिक कुलरच्या हवेत आराम करण्याचा बेत आखतात. मात्र वीज पुरवठा खंडित केल्या जात असल्याने नागरिकांना ऐन उन्हाच्या वेळेत उकाडा सहन करावा लागतो. यात भरीसभर म्हणून सायंकाळच्या वेळी वीज पुरवठा खडित करण्यात येत आहे. सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याचा परिणाम शेतीवर होत असल्याचे दिसते. ग्रामीण भागात तर भारनियमन अधिक वेळेकरिता केले जाते. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. शेतमालास योग्य प्रमाणात पाणी देता येत नसल्याचे भाजीपाला व उन्हाळी पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. वेळापत्रकानुसार भारनियमन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एकीकडे शासन कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पीक कसे जगवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅकेचे कर्ज काढुन पेरणी केल्यावर पाण्याअभावी उभे पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात लोटण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.रखरखत्या उन्हातही खंडित होत असलेला वीज पुरवठ्याने शहरवासीय त्रस्त झाले आहे. ठराविक वेळेत भारनियमन करण्यात यावे, अशी मागणी आहे. वीज वितरण लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)पाणी पुरवठा होतो प्रभावीतसकाळी होणाऱ्या भारनियमानामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होत आहे. पाण्याची टाकी भरत नसल्याने ऐन उन्हाळ्यात शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहे. उत्पादन चांगले या आशेवर शेतकरी असतानाच वेळीअवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्याव लागते आहे. आणिी असताना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक वाळत आहे.