शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

निर्णयातील ‘त्या’ दोन अटींना शासनाकडून स्थगिती

By admin | Updated: July 23, 2016 02:35 IST

गृहरक्षकांची सेवा समाप्ती व पुनर्नोंदणीच्या जाचक अटीविरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाच्या नावाखाली वर्धेतील गृहरक्षकांनी आंदोलन पुकारले आहे.

जिल्हा समादेशकांची माहिती : बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाकडून पत्र घेण्यास नकार वर्धा : गृहरक्षकांची सेवा समाप्ती व पुनर्नोंदणीच्या जाचक अटीविरोधात बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाच्या नावाखाली वर्धेतील गृहरक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा शुक्रवारी सातवा दिवस आहे. यातच शासनाने या दोन्ही मागण्या मान्य करून शासन आदेशातील त्या अटींना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे शुक्रवारी कळविले आहे. तसे पत्र पोलिसांमार्फत आंदोलकांना देण्याचा प्रयत्न झाला असता त्यांनी तो घेण्यास नकार दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे पोलिसांकडून ते पत्र आंदोलनस्थळी वाचून दाखविण्यात आले. दोन मागण्या मान्य केल्याचे महासमादेशकांनी कळविले आहे; मात्र तसे पत्रक काढून ते पाठविले नाही. या दोन मागण्यांव्यतिरिक्त इतर मागण्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. यामुळे शासनाकडून आलेले पत्र परत पाठविण्यात येत असल्याची माहिती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाचे ठमके यांनी दिली. या आंदोलनात बाहेर जिल्ह्यातील आंदोलकांची संख्या वाढत आहे. बाहेर जिल्ह्यातून एकूण ३२५ गृहरक्षक आतापर्यंत दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे. तेही उपोषणात सहभागी होत असून शुक्रवारी चार जणांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असून ती आता २४ झाली आहे. राज्य शासनाने १२ वर्षे सेवा झालेल्या गृहरक्षकाच्या सेवा समाप्ती आणि पुनर्नोंदणीबागत घातलेल्या जाचक अटींच्या विरोधात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. गत सात दिवसांपासून गृहरक्षकाचे उपोषण सुरू आहे. यात आतापर्यंत एकूण १९ गृहरक्षक रुग्णालयात दाखल झाले आहे. याची दखल घेत महासमादेशकांनी गृहरक्षकांच्या मुख्य मागण्या मान्य करीत इतर मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी गृहरक्षकाच्या शिष्टमंडळाला होमगार्ड महासमादेशक राकेश मारिया यांनी सोमवारी मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही चर्चा दुपारी ३ वाजता होणार असून न्यायप्रविष्ट बाबीच्या व्यतिरिक्त इतर बाबीवर चर्चा करण्यास ते तयार असल्याचे त्यांनी कळविले आहे. तत्पूर्वी ८ जुलैला गृहरक्षकांच्या शिष्टमंडळाने महासमादेशक यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिष्टमंडळाच्या विनंतीनुसार महासमादेशक यांनी १२ वर्षांच्या शासननिर्णयाच्या अंमलबजावणी व पुनर्नोंदणीच्या अटीबाबतही स्थगिती दिली असल्याचे कळविले आहे.(प्रतिनिधी)